नवी दिल्ली: आजपासून मे महिन्याची सुरूवात झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच तारखेला देशात काही बदल लागू झाले आहेत ज्याचा परिणाम प्रत्येकाच्या खिशावर पाहायला मिळू शकतो. १ मे पासून देशात लागू झालेल्या नव्या नियमांवर नजर टाकल्यास आता १ मे पासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. तसेच रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्येही बदल केला आहे.
आज १ मे २०२५ पासून तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनचा वापर करत असाल तर तुम्हाला अधिक चार्ज द्यावा लागेल. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एनपीसीआयच्या प्रस्तावावर फीस वाढवण्यास परवानगी दिली होती. अशातच पहिल्या तारखेपासून जर ग्राहक आपल्या होम बँकेव्यतिरिक्त इतर एटीएममधून पैसे काढत असतील तर त्यांना प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर १७ रूपयांच्या ऐवजी १९ रूपये द्यावे लागतील. याशिवाय दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून बॅलन्स तपासल्यास ६ रूपयांच्या ऐवजी ७ रूपये द्यावे लागतील.
१ मे २०२५ पासून होणारा दुसरा बदल हा रेल्वेशी संबंधित आहे. रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल होत आहे. आता वेटिंग तिकीट केवळ सामान्य डब्यामध्ये मान्य असेल. म्हणजेच जर तुमच्याकडे वेटिंग तिकीट असेल तर तुम्ही स्लीपर कोचमधून प्रवास करू शकत नाही. तसेच अॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड १२० दिवसांनी कमी होऊन ६० दिवस करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…