उत्तराखंड: नैनितालमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर जातीय तणाव निर्माण झाला आहे. संतप्त जमावाने दुकाने, हॉटेल्सची तोडफोड करून, अनेक ठिकाणी हाणामारीच्या देखील घटना घडल्या आहेत. यामुळे येथील शाळा, महाविद्यालये आज बंद ठेवण्यात आली आहेत. नैनीतालमध्ये वाढलेल्या तणावाचा फटका तिथल्या पर्यटकांना सुद्धा बसला आहे.
नैनिताल येथे बुधवारी रात्री १२ वर्षाच्या मुलीसोबत दुष्कर्म केल्याची घटना समोर आल्यानंतर, संतप्त लोकांनी आणि विशिष्ट संघटनेनी या घटनेचा निषेध जाताना तोडफोड आणि दगडफेक करत धुडगूस घातला. यादरम्यान काही ठिकाणी माशीदीवरहि दगडफेक करण्यात आली. जमाव पांगवण्यासाठी स्थानिक पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला.
अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने ६५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली. १२ एप्रिल रोजी संशयित आरोपीने अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून त्याच्या कारमध्ये नेऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार कंत्राटदार म्हणून काम करणाऱ्या ६५ वर्षीय उस्मानवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या आईने बुधवारी रात्री मुलीला पोलीस ठाण्यात आणले, त्यानंतर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत एकआयआर दाखल करून, संशयित आरोपीला अटक करण्यात आली.
पोलीस तक्रारीनंतर घटनेची माहिती वेगाने पसरली, त्यांनतर बुधवारी रात्री ९:३० च्या सुमारास काही लोकं आरोपीचे जिथे कार्यालय होते तिथे एकत्र जमले, आणि तिथल्या अल्पसंख्याक समुदायाच्या दुकानांची आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलची तोडफोड केली. व्हिडिओमध्ये काही लोक या दुकानांच्या कर्मचाऱ्यांना कानशिलात मारतानाही दिसत होते.
शहरात शांतता राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आरोपी उस्मानच्या घराभोवती बॅरिकेड्स लावले आहेत.
शहरात निर्माण झालेल्या जातीय तणावामुळे हॉटेल आणि खाणपिण्याची दुकाने बंद असल्यामुळे नैनितालमध्ये आलेल्या पर्यटकांना त्याचा फटका बसला आहे. प्रवास बंदीमुळे पर्यटकांना तिथून हलता देखील येत नाही. असे असले तरी, लवकरात लवकर परिस्थिती आटोक्यात आणण्याचा आणि जातीय तणाव कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…