वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया. हिंदू दिनदर्शिकेनुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून अक्षय्य तृतीयेकडे पाहिले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अ-क्षय्य (ज्याचा कधीही क्षय किंवा ऱ्हास होत नाही) असे मिळते, असा समज आहे.
वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया. हिंदू दिनदर्शिकेनुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून अक्षय्य तृतीयेकडे पाहिले जाते. भारतीय संस्कृतीच्या पौराणिक अधिष्ठानामुळे या दिवशी आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. हिंदू संस्कृतीचे सगळे सण हे निसर्गाच्या चक्रानुसार ठरलेले असतात. म्हणूनच गुढीपाडव्याला सुरू केलेली शेतीची नांगरणी या दिवशी संपवून शेतकरी जमिनीच्या मशागतीला लागतात. मशागत केलेल्या जमिनीत बियाणे पेरतात. भारतात काही ठिकाणी या दिवशी मृत्तिका पूजन करण्याची प्रथाही आहे.
मृत्तिकेच्या रुपात असणारी लक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहो, ही भावना या पूजनामागे असते. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीच्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. त्यामुळे या मुहूर्तावर वस्त्र, शस्त्र, दागिने किंवा मोठी खरेदी करण्यात येते.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…