मुंबई: भारतातील दक्षिणेतील सिनेकलाकार तिथल्या जनतेच्या मनात बसतात. त्याची क्रेझ एव्हडी आहे की काही दक्षिणेतील सिनेकलाकार मुखमंत्री झाले आहेत. म्हणजेच दक्षिणे तील जनता सिनेकलाकारांवर भरभरुन प्रेम करताना दिसली आहे. याचदरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये आंध्र प्रदेशात अभिनेत्री समांथाच्या नावाने एक मंदिर बांधलेले दिसत आहे.
अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये आंध्र प्रदेशात अभिनेत्री समांथाच्या नावाने एक मंदिर बांधलेले दिसत आहे. 28 एप्रिल रोजी अभिनेत्री समांथा रुथने तिचा वाढदिवस साजरा केला. चाहत्यांनीही समंथाचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री सामंथाचे मंदिर दिसत आहे. या चाहत्याने या मंदिरात अभिनेत्रीचा 38 वा वाढदिवस साजरा केला. व्हिडिओमध्ये मंदिराबाहेर ‘समंथाचे मंदिर’ असे लिहिलेले दिसत आहे. आत प्रवेश केल्यावर सामंथाचे दोन पुतळे दिसतात; त्यापैकी एक सोनेरी रंगाचा आहे.
https://prahaar.in/2025/04/30/a-14-year-old-stormy-century-vaibhav-suryavanshi-created-history/
त्या चाहत्याने अभिनेत्रीसाठी केवळ मंदिरच बांधले नाही तर अनाथ मुलांसाठी एक पार्टी देखील आयोजित केली. अनाथ मुलांसोबत सामंथाच्या वाढदिवसाचा केकही कापण्यात आला. हे मंदिर बांधणाऱ्या चाहत्याचे नाव तेनाली संदीप आहे. या चाहत्याने माध्यमांशीही संवाद साधला. तेनाली म्हणाला, ‘मी आंध्र प्रदेशचा आहे. मी सामंथाचा खूप मोठा चाहता आहे. मी गेल्या तीन वर्षांपासून त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. मी काही वर्षांपूर्वी हे मंदिरही बांधले होते. दरवर्षी मी सामंथाच्या वाढदिवसाला मुलांना खायला घालतो आणि केक कापतो. समंथाने मला खूप प्रेरणा दिली आहे.
अभिनेत्री समांथाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी ती ‘सिटाडेल हनी बनी’ या वेब सिरीजमध्ये दिसली होती, ज्यामध्ये वरुण धवन देखील होता. ती ‘ब्रह्मांड’ ही वेब सिरीज देखील करत आहे. निर्माती म्हणून, समंथाचा एक चित्रपटही या वर्षी प्रदर्शित होणार आहे.
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…