Share

मुंबई (ज्ञानेश सावंत) : आज चेन्नईच्या चिंदंबरम मैदानावर पंजाब विरुद्ध चेन्नई हा सामना खेळला जाणार आहे. मागील दोन सामन्यात पंजाबला विजय मिळवता आला नाही त्यामुळे आजचा सामना ते विजयाच्या हेतूनेच खेळतील. बेंगळुरूकडून पराभव पत्करल्यावर पंजाबने कोलकत्ता विरुद्ध चांगली फलंदाजी केली, पण तो ही सामना पावसामुळे गमवावा लागला. आज पंजाब पुन्हा एकदा चांगली धावसंख्या उभारेल अशी आशा आहे. पंजाबचे सर्वच फलंदाज फॉर्म मध्ये असल्यामुळे ते त्यांना सहज शक्य आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना चेन्नईला कमी लेखून चालणार नाही. चेन्नईचे फलंदाज अपयशी ठरत असतील तरीही कोणत्या फलंदाजाला कधी सुर गवसेल हे सांगता येणार नाही.

आयपीएल २०२५ मध्ये आता चुरस पाहायला मिळते आहे, प्रत्येक संघ जिंकण्यासाठी झगडताना दिसतो आहे. गुण तकत्यातील तळाचे संघ समोरच्या संघाला सोपा विजय मिळवू देत नाही. पर्वच्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सने मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून विजय मिळवला. चेन्नई जरी गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर असेल तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही कारण २०-२० मध्ये कधीही काहीही होऊ शकते. पंजाबने आजचा सामना गमावला तर त्यांच्यासाठी पात्रता फेरी गाठणे कठीण होईल. चला तर जाणून घेऊयात पंजाब चेन्नई विरुद्ध होणाऱ्या सामन्यात जिंकण्यासाठी कोणती व्यूहरचना करते.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

24 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

52 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

1 hour ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

3 hours ago