नाशिक : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीया सणाला फार महत्त्व असते. या सणाच्या निमित्ताने आज बहुतांश मंदिरात फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याची सजावट केली जाते. शहरातील इस्कॉन मंदिरामध्ये अक्षय तृतीया निमित्त आंब्याची आरास करण्यात आली तर यावेळी भगवंतांना चंदन लेप देखील लावण्यात आला. श्री राधा मदन गोपाल मंदिर (इस्कॉन) येथे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ३०० किलो आंब्यांचा विशेष आरास करण्यात आला. भगवंत सांगतात की, मला एखादे पान, फुल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. ह्याच भावनेतून भक्तांनी फळांचा राजा असणारा आंबा आपल्या आराध्य श्री मदन गोपाल यांना अर्पण केला.
https://prahaar.in/2025/04/29/devotees-vehicle-involved-in-fatal-accident-26-injured/
विविध प्रकारच्या पानांचा, फुलांचा व तब्बल ३०० किलो आंब्यांचा वापर करून हा आरास करण्यात आला होता. या मध्ये प्रामुख्याने रत्नागिरी व देवगड हापूस, बदाम, केशर, लालबाग ह्या आंब्यांचा वापर करण्यात आला होता आणि सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या सर्व आंब्यांचे वाटप संध्याकाळी महाप्रसादाबरोबर भाविकांना करण्यात आले. दिवसभर नाशिककरांनी दर्शनाचा लाभ घेतला. ह्या विशेष दर्शनासाठी दिवसभर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी पहायला मिळाली.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…