नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात, २६ जखमी

Share

वणी: रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच सप्तशृंगी मातेच्या वणीच्या गडावर नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. वळण रस्त्यावर चालकाला अंदाज न आल्याने वाहन रस्त्याच्या खाली उतरून उलटले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात गाडीत बसलेले २६ भाविक जखमी झाले असून जखमींमध्ये लहान मुलांसह महिलांचा देखील समावेश आहे. जखमींना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. वणी नांदुरी रस्त्यावर दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर हा अपघात झाला आहे.

आज सकाळी छोटा हत्ती या मालवाहू गाडीतून परिवार व नातलग नवस फेडण्यासाठी नांदुरी गडावर जाण्यासाठी निघाले होते. वळण रस्त्यावर चालकाचा अंदाज चुकला नांदुरी गड काही अंतरावर असताना भाविकांच्या गाडीला अपघात झाला. वणी-नांदुरी रस्त्यावर दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर वळण रस्ता असून येथे वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. यामुळे वाहन सरळ जाऊन रस्त्याच्या खाली उतरून भाविकांनी भरलेला टेम्पो वळणावर उलटल्याने टेम्पोत असलेले २० हुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. लहान मुलांसह महिला, पुरुष जखमी आहेत. यात काही जणांना अधिक मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या वाहन धारकांनी लागलीच मदत करत जखमींना वणीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

4 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

4 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

4 hours ago