नवी दिल्ली: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर कारवाईची मागणी केली जात आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही दलांच्या अध्यक्षांसह उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत सीडीएस अनिल चौहान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही सहभागी होते.
सूत्रांच्या माहितीनुसार ही बैठक सुमारे अडीच तास सुरू होती. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान मोदींनी लष्कराला पूर्णपणे सूट दिली आहे. ते म्हणाले, दहशतवादाला उत्तर देणे आमचा दृढ राष्ट्रीय संकल्प आहे. त्यांनी यावेळेस भारतीय सैन्य दलाच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आमची प्रत्युत्तर कारवाईची पद्धत काय आहे, टार्गेट्स काय असतील आणि याची योग्य वेळ काय असेल या प्रकारचे ऑपरेशन निर्णय घेण्यासाठी सैन्य दलाला संपूर्ण सूट देण्यात आली आहे.
पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला नाहक जीव गमवावा लागला होता. यावेळेस पंतप्रधानांनी या हल्ल्याचा कट रचणारे तसेच दहशतवाद्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले होते.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…