पाकिस्तानच्या सैन्यात पसरली अस्वस्थता, लष्करप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी

Share

इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. भारताचा पवित्रा बघून पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी आणि लष्करी अधिकारी आपल्या कुटुंबियांना आणि जवळच्या नातलगांना परदेशी पाठवून दिले आहे. अनेकांनी आपली खासगी संपत्ती परदेशी बँकांतून हस्तांतरित (ट्रान्सफर) केली आहे. तर काही लष्करी अधिकाऱ्यांनी वेगवेगळी कारणं पुढे करुन नोकरी करण्यास असमर्थ असल्याचे सांगायला आणि राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढू लागला आहे. असीम मुनीरचे कुटुंबही देश सोडून गेले आहे. याशिवाय बिलावल भुट्टो यांचे कुटुंबही देश सोडून गेले आहे.

पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जबाबदार असलेल्या सर्व देशद्रोह्यांना कल्पनाही करता येणार नाही एवढी कठोर शिक्षा देण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा ऐकल्यापासून पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी अतिरेकी हल्ला झाला. यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख पुढचे काही दिवस कोणालाच दिसले नाही. यामुळे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर बेपत्ता असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. अखेर पाकिस्तानच्या पीएमओच्या एक्स हँडलवरुन जनरल असीम मुनीर कार्यरत आहेत हे सांगण्यासाठी एक पोस्ट करण्यात आली. पाकिस्तानच्या सैन्यात तर भारताच्या हल्ल्याविषयी आधीपासूनच भीती आहे. पाच हजारांपेक्षा जास्त सैनिकांनी तडकाफ़की राजीनामा दिला आहे. यामुळे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढू लागला आहे.

याआधी काकुल भागातील पाकिस्तान मिलिटरी अकादमी (पीएमए) येथे कॅडेट्सच्या पासिंग आउट परेडला संबोधित करताना पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर द्विराष्ट्र या संकल्पनेवर भाष्य केले होते. द्विराष्ट्र म्हणजे हिंदू आणि मुसलमान या दोन धर्मांसाठी असलेली दोन स्वतंत्र राष्ट्र. मुनीर यांच्या या भूमिकेमुळेच ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Recent Posts

IND vs PAK Tension: प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर देऊ, जयशंकर यांनी EUला दिली पाकिस्तान हल्ल्याची माहिती

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…

47 minutes ago

Live: भारताने लाहोर-सियालकोटमध्ये केला हल्ला, पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…

1 hour ago

PBKS vs DC, IPL 2025: मोठी बातमी! पाकिस्तान हल्ल्यादरम्यान रद्द झाला पंजाब-दिल्लीचा IPL सामना

धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…

2 hours ago

Jammu Drone Attack : पाकड्यांची मस्ती काय थांबेना! जम्मूत ड्रोन हल्ला, पठाणकोठमध्ये स्फोट, जम्मूमध्ये ब्लॅकआऊट

जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…

3 hours ago

थेट प्रहार! पाकिस्तानमधील गाणी, सिरीज, चित्रपट भारतात थांबवा!

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…

3 hours ago