नवी दिल्ली: केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीस तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. गृहमंत्रालयाने याबाबत अधिकृतरित्या नोटिफिकेशन जारी केले आहे. आता एनआयए औपचारिकरित्या या बाबत केस दाखल करून विस्तृत तपास करेल.
सूत्रांच्या माहितीनुसार, एनआयएची टीम आधीपासूनच पहलगाम येथे उपस्थित होती. त्यांनी हल्ल्यानंतर घटनास्थळाचे निरीक्षण केले आहे. एजन्सीची फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पुरावे शोधत आहे. तपास यंत्रणा स्थानिक पोलिसांकडून यासंबंधीची केस डायरी, एफआयआर आणि इतर महत्त्वाचे कागदपक्ष आपल्या ताब्यात घेईल.
मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएची टीम पहलगाम हल्ल्यातील पीडितांची भेट घेऊन पुरावे मिळवण्याच्या तयारीत आहे. एनआयएची विशेष टीमने दहशतवादी हल्ल्यात जिवंत बचावलेल्या पर्यटकांसह प्रत्यक्षदर्शींसोबतही संपर्क कऱण्यास सुरूवात केली आहे.
पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा जीव गेला होता. यातील सुरूवातीच्या तपासावरून मिळालेल्या माहितीनुसार यात सामील असलेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच ते सात असू शकते. अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण प्राप्त कमीत कमी दोन स्थानिक दहशतवाद्यांची मदत मिळाली होती.
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…