आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे. पण, मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होतो, हा शोध नेमका लागला कसा? चला जाणून घेऊया या लेखातून…
मलेरिया खरंतर जवळपास दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून माणसाला होतोय.. इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेला ग्रीक वैद्य हिपोक्रेटस यानेही मलेरियासारख्या आजाराची नोंद केलेली आढळते. पण, हा आजार डासांपासून होतो, हे शोधण्याचं श्रेय मात्र, डॉक्टर सर रोनाल्ड रॉस या ब्रिटीश माणसाला जातं.
सन १८९८मध्ये त्यांनी हा शोध लावला. या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालं. अॅनोफिलिस या प्रजातीच्या डासाची मादी चावल्यामुळे मलेरिया होतो. हा डास प्लाझमोडियम सारख्या परजीवी जंतूचा प्रसार करतो. या जंतुची अंडी आधी डासाच्या पोटात तयार होतात, मग ती डास चावल्यानंतर त्याच्या लाळेतून माणसाच्या शरीरात जातात, हे रॉस यांनी शोधून काढलं.
थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा ही लक्षणं दिसतात. वेळीच उपचार केले नाहीत तर रुग्ण कोमात जाऊन दगावण्याची शक्यता असते. त्यामुळेचं डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणं नष्ट करणं, तिथे वेळोवेळी औषध फवारणी करणं गरजेचं असतं.
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…
नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…