उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत दुडू बसंतगड परिसरात सहाव्या पॅरा एसएफचे हवालदार झंटू अली शेख गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्याने त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला सलामी दिली आहे. जीओसी आणि व्हाईट नाईट कॉर्प्सच्या सर्व रँकनी त्यांचे धाडस आणि शौर्य याचे सन्मानाने स्मरण केले आणि त्यांच्या स्मृतींन उजाळा दिला.
पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांनी अतिरेक्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांना शोधून ठार केले जात आहे. मागील दोन महिन्यात अतिरेक्यांविरुद्ध झालेल्या अकरा चकमकींमध्ये एकूण सहा जवान हुतात्मा झाले आहेत. सुरक्षा पथकांची अतिरेक्यांविरुद्धची मोहीम सुरू आहे आणि सुरू राहणार आहे.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…