Pakistani Hindu Visa: पाकिस्तानी हिंदूंचा व्हिसा रद्द होणार नाही, सरकारची घोषणा

Share

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पाकिस्तानी हिंदूमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता परराष्ट्र मंत्रालयाने मोठी घोषणा करताना स्पष्ट केले आहे की पाकिस्तानी हिंदूचा व्हिसा रद्द होणार नाही.

पाकिस्तानी हिंदू अल्पसंख्याक समुदायाचे लोग जे भारतात राहत आहेत त्यांना कोणताही त्रास होणार नाही. हे पाऊल मानवजातीला अनुसरून उचलण्यात आले आहे. या निर्णयामुळे हिंदू शरणार्थींची चिंता संपली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की ज्या पाकिस्तानी हिंदूंना लाँग टर्म व्हिसा जारी करण्यात आला आहे त्यांना परत जावे लागणार नाही. पाकिस्तानातून मोठ्या संख्येने हिंदू पलायन करून भारतात आले आहेत आणि येथील नागरिकतासाठी अर्ज करत आहेत. एका रिपोर्टनुसार, हजारो पाकिस्तानी हिंदू शरणार्थी विविध भारतीय शहरांमध्ये राहत आहेत.

दिल्लीपासून ते गुजरातपर्यंत हिंदू शरणार्थी

राजस्थानच्या जोधपूर, जैसलमेर, बाडमेर आणि बिकानेर सारख्या जिल्ह्यांमध्ये हिंदू शरणार्थींची संख्या मोठी आहे. जोधपूरमध्ये तर अनेक बेकायदेशीर कॉलनीज बनवण्यात आल्या आहेत. दिल्लीतील मजनू का टीला आणि आदर्शनगर या भागांमध्ये पाकिस्तानी हिंदू शरणार्थी आहे. दरम्यान, यातील काही शरणार्थींना भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. गुजरातच्या कच्छ आणि अहमदाबादमध्येही पाकिस्तानी हिंदू शरणार्थी आहेत. जम्मू शहरात साधारण २६ हजार ३१९ पाकिस्तानी हिंदू शरणार्थींची कुटुंबे आहेत.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

9 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

36 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

1 hour ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago