कुणाल कामराला दिलासा, आरोपपत्र दाखल होईपर्यंत अटकेपासून संरक्षण

Share

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन कुणाल कामरा याची मुंबई पोलीस चौकशी करू शकतात. पण आरोपपत्र दाखल होईपर्यंत कुणालला अटकेपासून संरक्षण देण्यात येत आहे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्देशांमुळे कुणाल कामरावरील अटकेची टांगती तलवार सध्या दूर झाल्याचे चित्र आहे. न्यायालयाकडून कुणाल कामराला हा दिलासा मिळाला आहे.

स्टँड-अप कॉमेडी शो करताना कुणाल कामराने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी खार पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आली आहे. ही एफआयआर रद्द करण्याची कुणाल कामराची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. न्यायमूर्ती एम. मोडक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. कुणाल कामरा प्रकरणाशी संबंधित सुनावणी सुरू राहणार आहे.

कुणाल कामरा सध्या चेन्नईच्या घरी वास्तव्यास आहे. यामुळे पोलिसांना चौकशी करायची असेल तर चेन्नईत जाऊन अथवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करावी लागणार आहे.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

4 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

4 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

4 hours ago