Mumbai Metro : मेट्रो-३ फेज २ ए मार्ग लवकरच होणार सुरू!

Share

मे महिन्याच्या सुरवातीस होणार उद्घाटन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai Metro) मेट्रो-३ फेज २ ए (metro 3-phase 2  A) या मार्गावरील अनेक स्थानकांचे फोटो आणि व्हिडीओदेखील समोर आले आहेत. आता लवकरच शहरातील सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यातील भूमिगत मेट्रो लाईन, ज्याला अॅक्वा लाईन म्हणूनही ओळखले जाते, लवकरच सुरू होणार आहे. ही सुविधा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते वरळी येथील आचार्य अत्रे चौकाला जोडणारी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनीही यास दुजोरा दिला. भिडे यांनी नमूद केले की, हा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि मेट्रो रेल सेफ्टी कमिशनर (सीएमआरएस) कडून मंजुरीची वाट पाहत आहे, जी पुढील दोन दिवसांत अपेक्षित आहे.

एकदा प्रमाणित झाल्यानंतर, मुंबई मेट्रो-३ (Mumbai metro 3) चा दुसरा टप्पा सुरु होईल. साधारण ६० किलोमीटरचा मेट्रो मार्ग आधीच कार्यरत असल्याने, मुंबईतील मेट्रो लवकरच मुंबई महानगर प्रदेशात ३७४ किलोमीटरपर्यंत वाढेल, असे त्या म्हणाल्या. सर्व नियोजित कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर, दररोज सुमारे एक कोटी प्रवाशांना याचा फायदा होईल. या मार्गाच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, १ मे रोजी महाराष्ट्र दिनी किंवा २ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान हे उद्घाटन होऊ शकते अशी शक्यता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या मेट्रो लाईन- ३ च्या पहिल्या टप्प्यात १० स्थानके आहेत. या मेट्रोच्या सकाळी साडेसहा ते रात्री साडेदहापर्यंत दररोज ९६ फेऱ्या होतात.

आरे ते बीकेसी दरम्यानचा प्रवासाचा वेळ रस्त्याने एका तासापेक्षा जास्त असून, मेट्रोने तो फक्त ३० मिनिटांत पूर्ण होतो. या मार्गावरील तिकिटांचे दर १० ते ५० रुपयांच्या दरम्यान आहेत. फेज २ ए नंतर, फेज २ बी (वरळी ते कफ परेड) जुलै २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मुंबई मेट्रो-३ लाईन पूर्ण झाल्यावर, ३३.५ किमी लांबीचा हा भूमिगत कॉरिडॉर सहा प्रमुख व्यवसाय केंद्रे, ३० प्रमुख कार्यालय क्षेत्रे, १२ शैक्षणिक संस्था, ११ रुग्णालये, १० प्रमुख वाहतूक बिंदू आणि २५ सांस्कृतिक आणि मनोरंजन स्थळांना जोडेल. यासह ही लाईन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल्सपर्यंत थेट प्रवेश प्रदान करेल. भूमिगत स्थानकांमध्ये मोबाइल कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी एअरटेल, जिओ, व्होडाफोन आणि एमटीएनएल यांच्या सहकार्याने अँटेना आणि रिपीटर्स बसवले जात आहेत.

Recent Posts

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

6 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

21 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

1 hour ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

6 hours ago