मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश दाखविला तेव्हा असे वाटत होते की हा आयपीएल हंगाम हैदराबाद गाजविणार, परंतु दोन सामन्यानंतर त्यांचा संघ फार काही पराक्रम करू शकला नाही. आता पर्यंत ते आठ सामन्यापैकी सहा सामने पराभुत झाले आहेत त्यामुळे यापुढील जास्तिजास्त सामने त्यांना जिंकावे लागतील. त्यांच्या फलंदाजामध्ये सातत्याचा अभाव असल्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागते.
इशान किशन सुरुवातीचे दोन सामने फक्त खेळला बाकी सर्व सामन्यात तो संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकला नाही. हैदराबादचे आघाडीचे सर्वच फलंदाज फॉर्ममध्ये आहेत परंतु मारण्याच्या नादात ते विकेट गमावून बसतात. एक ते दोन फलंदाजाना खेळपट्टीवर ८-१० षटके टिकून रहावे लागेल. समोरच्या सर्व संघानी हैदराबादच्या फलंदाजाचा कसून अभ्यास केला व त्याप्रमाणे प्रत्येक दोन चेंडूनंतर एक स्लोवर चेंडू टाकला जातो ज्यामुळे विकेट गमावली जाते.
हैदराबादची गोलंदाजी ही खास होत नाही आहे त्यामुळे गेल्या आठ सामन्यांत ते एकदाही समोरच्या संघाला लवकर गुंडाळू शकले नाहीत. चेन्नईचा संघ ही फळदाजीमध्ये कमी पाडतो आहे. आघाडीचे फलंदाज संघाला मोठी धावसंख्या उभारून देऊ शकत नाहीत. धावांचा पाठलाग करताना ही हा संघ कमी पडतो आहे. आजच्या सामन्या बद्दल बोलायचे झाले तर हैदराबादचा संघ हा चेन्नई पेक्षा उजवा दिसतो. कारण दोन नवीन खेळाडू हैदराबादच्या संघात शेवटच्या षटकात खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. पर्वाच्या सामन्याप्रमाणे हेनरिक क्लासेन व अभिनव मनोहर संघाला चेन्नई विरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. चला तर बघूया चेन्नई घरच्या मैदानावर हैदराबादला कसा शह देते.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…