Metro 3 : मेट्रो ३ च्या आरे ते बीकेसी मार्गिकेवरील वेळापत्रकात बदल

Share

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीचा सेवा कालावधीत एका तासाने कमी करण्यात आला आहे, तर शनिवारी सकाळचा सेवा कालावधी एका तासाने तर रात्रीचा सेवा कालावधी एका तासाने कमी करण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवारी या मार्गिकेवरील सेवा सकाळी ६.३० ते रात्री ९.३० दरम्यान सुरू राहणार आहे, तर शनिवारी सकाळी ७.३० ते रात्री ९.३० या वेळेत सेवा सुरू राहणार आहे. (Mumbai news)

भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक दरम्यानच्या टप्पा २ अ चे काम पूर्ण झाले आहे. सध्या या मार्गिकेवर मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्या चाचण्या सुरू आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर सीएमआरएसकडून बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकासाठी सुरक्षा प्रमाणपत्र देण्यात येईल. हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास टप्पा २ अ च्या संचलनाचा मार्ग मोकळा होईल. येत्या दोन-तीन दिवसांत सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक असा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. त्या अानुषंगाने सीएमआरएसच्या चाचण्यांसाठी शुक्रवारी, शनिवारी एमएमआरसीने आरे ते बीकेसी मार्गिकेवरील वेळापत्रकात बदल केला आहे. आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रो गाड्यांची आणि इतर यंत्रणांची, प्रणालींची चाचणी करण्यासाठी शुक्रवार, शनिवारी वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. (Mumbai Metro 3)

एमएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आरे ते बीकेसी मार्गिकेवरील सेवा रात्री १०.३० ऐवजी रात्री ९.३० या वेळेत सुरू राहणार आहे. रात्रीच्या वेळेस एका तासाने सेवा कालावधी कमी करण्यात आला आहे, तर शनिवारी सेवा रात्री १०.३० ऐवजी रात्री ९.३० या वेळेत सुरू राहणार आहे. शनिवारी सेवा कालावधी सकाळी एका तासाने तर रात्री एका तासाने कमी करण्यात आला आहे. तेव्हा प्रवाशांनी याची नोंद घेत या वेळेत प्रवासासाठी इतर पर्यायांचा वापर करावा असे आवाहन एमएमआरसीकडून केले आहे.

मूळ वेळापत्रक

सोमवार ते शनिवार -सकाळी ६.३० ते १०.३०रविवार-सकाळी ८.३० ते १०.३०

वेळापत्रकातील बदल असा

शुक्रवार -सकाळी ६.३० ते ९.३० ( सेवा कालावधी एका तासाने कमी)

शनिवार-सकाळी ७.३० ते रात्री ९.३० (सेवा कालावधी सकाळी एका तासाने तर रात्री एका तासाने कमी)रविवारच्या वेळापत्रकात सध्या तरी कोणताही बदल नाही.

Recent Posts

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

12 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

14 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

34 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

54 minutes ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

1 hour ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

1 hour ago