मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

Share

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू सीमेवर अनेक ठिकाणी शेती, घनदाट जंगल, नदी – नाले – ओढे आहेत. यामुळे सीमा १०० टक्के सील करणे भारतासाठी कठीण आहे. यावर उपाय म्हणून मोदी सरकारने इस्रोच्या उपग्रहांची मदत घेण्याची तयारी सुरू केली आहे.

सध्या इस्रोचे ५५ उपग्रह विविध कामांत गुंतले आहेत. लवकरच लहान आकाराचे पण उच्च क्षमतेचे असे १०० ते १५० उपग्रह अंतराळात पाठवून केंद्र सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करणार आहे. यानंतर जर कोणी विना परवानगी पाकिस्तानमधून सागरी अथवा भू सीमा ओलांडून येत असेल तर उपग्रहामुळे जवळच्या सुरक्षा यंत्रणेला संदेश मिळेल. घुसखोरी नेमकी कोणत्या जागेवरुन होत आहे त्याची माहिती मिळेल. घुसखोरांचे लाईव्ह फूटेज उपलब्ध होईल. यामुळे सुरक्षा पथकांना तातडीने कारवाई करुन घुसखोरीला आळा घालणे शक्य होणार आहे.

केंद्र सरकार सीमेवरील बंदोबस्तासाठी उपग्रहांची मर्यादीत प्रमाणात मदत घेते. पण नव्या योजनेनुसार १०० ते १५० उपग्रह फक्त सागरी तसेच भू सीमा सील करणे आणि घुसखोरीला आळा घालणे यासाठीच वापरले जाणार आहेत. या उपग्रहांचे सीमावर्ती भागात इतर उपयोग पण केले जातील. पण सुरक्षेच्या कारणामुळे या संदर्भात सरकारी पातळीवरुन जास्त माहिती देण्यात आलेली नाही.

भारताचा स्पेस डॉकिंगचा सलग दुसरा प्रयोग यशस्वी

भारताने अलिकडेच अंतराळात स्पेस डॉकिंगचा सलग दुसरा प्रयोग यशस्वी केला. या प्रयोगांना मिळणाऱ्या यशातूनच भविष्यात भारताला दोन किंवा त्यापेक्षा जास्त उपग्रहांना एकमेकांशी जोडणे अथवा अंतराळ स्थानकाची निर्मिती करणे हे शक्य होणार आहे. स्पेस डॉकींगची क्षमता अमेरिका, रशिया, चीन आणि भारत या चार देशांकडेच आहे.

Recent Posts

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

4 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

24 minutes ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

38 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

53 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

2 hours ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago