मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात केवळ आरोग्याचीच नाही तर त्वचेचीही काळजी घेणे गरजेचे असते. धूळ आणि सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावर कोरडेपणा आणि पुरळ येऊ शकतात. त्वचेची काळजी घेण्यामध्ये अनेक टप्पे असतात, जसे की त्वचा स्वच्छ करणे, टोनर लावणे आणि मॉइश्चराइझ करणे. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार उत्पादने खरेदी करणे महत्वाचे आहे
कोरडी त्वचा : उन्हाळ्यात कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी हलकी, मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेटिंग उत्पादने निवडावीत. सनस्क्रीनसाठी, ५० पेक्षा जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन निवडा. कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी असे क्लींझर निवडावे जे त्वचेच्या ओलाव्याला हानी पोहोचवणार नाही.
संवेदनशील त्वचा : उन्हाळ्यात संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी हलके, सुगंध नसलेले आणि कमी संरक्षक असलेले उत्पादने निवडावीत. शक्य होईल तेवढे नैसर्गिक घटक असलेले उत्पादने निवडा. नैसर्गिक टोनर वापरा, ज्यासाठी तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता.
सामान्य त्वचा : जर तुमची त्वचा सामान्य असेल तर तुम्ही तेलमुक्त आणि पाण्यावर आधारित उत्पादने निवडावीत. तुम्ही स्पेक्ट्रम सनस्किन हा ब्रँड निवडावा. जे UVA आणि UVB दोन्ही किरणांपासून संरक्षण करू शकते. हलके, पाणी-आधारित आणि तेल-मुक्त मॉइश्चरायझर्स वापरा. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचा चिकट होत नाही.
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…
मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…
नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…