मुंबई: जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडेल की नाही , चित्रपटाला यश मिळेल की नाही याबाबत सर्वच कलाकारांना चिंता असते. एवढंच नाही तर आपल्या चित्रपटाला पुरस्कार मिळावा ही तर संपूर्ण टीमची इच्छा असते. ऑस्कर हा जगातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. आणि हा पुरस्कार आपल्या चित्रपटाला मिळावा हे सगळ्यांच कलाकारांचं स्वप्न असतं.
आपल्या चित्रपटाच्या यशासाठी कलाकार देवाकडेही मनोभावे प्रार्थना करतात. काहीजण उपवास करतात, काही जण मोठ्या धार्मिक स्थळी जाऊन परमेश्वरासमोर नतमस्तक होतात. अशाच एका अभिनेत्याने त्याच्या चित्रपटाच्या यशासाठी कठीण उपासना केली होती. त्याने व्रत ठेवलं होतं त्यासाठी तो तब्बल ४१ दिवस अनवाणी फिरत होता. अखेर त्याचं देवाने ऐकले आणि त्याच्या चित्रपटाला ऑस्कर मिळाला असं भरभरून यश मिळालं.
हा चित्रपट म्हणजे साउथचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘आरआरआर’ आणि ज्याने यासाठी कडक व्रत ठेवलं होतं तो अभिनेता म्हणजे त्यात मुख्य भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता राम चरण. राम चरणने त्याच्या कारकिर्दीत एकामागून एक हिट चित्रपट दिले. मात्र त्याला खरं यश एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाद्वारे मिळाले.
चित्रपटाच्या यशासाठी त्याने कठोर साधना केली होती. तो ४१ दिवस अनवाणी राहिला आणि तो फक्त काळे कपडे घालत होता. राम चरण हे भगवान अयप्पा यांचा महान भक्त आहे. अनेक लोक ४१ दिवस भगवान अय्यप्पाची कठोर साधना करतात. यामध्ये साधकाला ४१ दिवस अनवाणी राहावे लागते. शाकाहारी जेवण घ्यावे लागते आणि फक्त काळ्या रंगाचे कपडे घालावे लागतात. याशिवाय, इतर अनेक कठोर नियमांचे पालन करावे लागते.
४१ दिवसांनंतर, केरळमधील सबरीमाला येथील अयप्पा स्वामी मंदिरात जाऊन भक्तांना साधना पूर्ण करावी लागते. आरआरआरच्या रिलीजच्या वेळी, राम या साधनेत होता. एका रिपोर्टनुसार राम चरण वयाच्या २० व्या वर्षापासून ही साधना करत आहेत आणि तो वर्षातून दोनदा त्यात भाग घेतो.
राम चरणसोबत ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांसारख्या कलाकारांनीही ‘आरआरआर’मध्ये काम केले होते. या चित्रपटाने जगभरात १२५० कोटी रुपये कमावले तसेच या चित्रपटाने २०२३ मध्ये ‘नातू नातू’ या गाण्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट मूळ गाणे’ श्रेणीत ऑस्कर जिंकला.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…