चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

Share

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : गेल्या तीन वर्षांपासून चिपी विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या विद्युतीकरणाच्या समस्या आता मार्गी लागणार आहेत. विमानतळावरील विद्युतीकरणाच्या समस्यांसहीत लाईन शिफ्टिंग व रूपांतरणाच्या कामासाठी जिल्हा नियोजनामधून दोन कोटी ३७लाख ५७ हजार रुपयांच्या खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नाईट लैंडिंगची समस्या सुटणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. चीपी विमानतळाकरिता एमएससीबीने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

चिपी विमानतळासाठी वीन पुरवठा करण्याच्या अनुषंगाने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याने सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील पाट फिडरकडून जाणाऱ्या ११ केव्ही लाईनच्या शिफ्टिंग व रूपांतरणासाठी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७लाख ५७ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला होता. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार जिल्हा नियोजनमधून या कामासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

चिपी विमानतळ सुरू होऊन तीन वर्षे उलटून गेली तरी या ठिकाणी नाईट लौडंगचा प्रश्न रेंगाळला होता. यासाठी वीज कंपनीच्या पाट येथील फिडरकडून वीज पुरवठा होत असताना ११ केव्हीच्या मुख्य लाईनच्या शिफ्टिंगसाठी मोठा खर्च होता. पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेऊन जिल्हा नियोजन समितीमधून यासाठीचा निधी देऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. यात अंतर्गत विद्युतीकरण, वाढीव पथदिवे, अंतर्गत उच्ब दाबाच्या वीजवाहिन्या, लघुदाबाच्या विजवाहिन्या उभारणे, नवीन रोहित्र रोहित क्षमता वाढवणे आदी कामांचा समावेश आहे.

नाईट लैंडिंगचा प्रश्न निकाली लागेल

चिपी विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली तरी आवश्यक विद्युतीकरणाच्या अभावामुळे नाईट लैंडिंगचा मोठा प्रश्न होता, मात्र, आता विजेची समस्या मिटविण्यासाठी निधी मंजूर झाल्यामुळे भविष्यात येथील नाईट लैंडिंगचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.

बंद विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न चिपी विमानतळावर बंद असलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी फ्लाय ९१ च्या अधिका-यांशी सोमवारी मंत्रालयातील आपल्या दालनात बैठक घेतली होती. त्यानंतर लगेचच दुस-या दिवशी येथील विजेची समस्या मिटविण्यासाठीच्या कामालाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आत्ता चिपी विमानतळावरून जास्तीत जास्त विमानसेवा सुरू करण्यासाठी मंत्री नितेश राणे प्रयत्नशील आहेत.

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

25 minutes ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

32 minutes ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

39 minutes ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

54 minutes ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

1 hour ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

3 hours ago