कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला मिळतात. अशीच एक घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापुरात ट्रकच्या धडकेत एस टी बसचा अपघात झाला आहे. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले असून एसटी बसच्या चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
कोल्हापुरातील चंदगडमध्ये बेळगाव -वेंगुर्ला मार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला असून ट्रकच्या पुढील भागाचेही नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत १५ प्रवासी जखमी झाले असून एसटी बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून बेळगाव वेंगुर्ला रस्ताच्या रुंदीकरण रखडलं आहे. त्यामुळे, येथे अपघाताच्या घटनांचं सत्र दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दरम्यान, या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्त्याच्या दुरुस्तीसह बसच्या मेन्टेनन्स आणि खराब बसच्या वाहतुकीचा मुद्दा समोर आला आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…