नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात प्रामुख्याने व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवे आयात शुल्क धोरण जाहीर केल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम दिसले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपाध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर येत आहेत.
भारत आणि अमेरिका चर्चेतून दोन्ही देशांचे हित साधणारा नवा व्यापार करार करण्यास उत्सुक आहेत. यामुळे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या दौऱ्यात काय घडते याकडे अनेकांचे लक्ष आहे.
भारत दौऱ्यात उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. यावेळी प्रामुख्याने अर्थव्यवस्था, व्यापार आणि भू-राजकीय संबंधांवर चर्चा होणार आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. यानंतर उपाध्यक्ष जेडी व्हान्स २२ एप्रिल रोजी जयपूर आणि २३ एप्रिल रोजी आग्रा येथे भेट देणार आहेत.
भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या १९० अब्ज डॉलर एवढा मोठा व्यापार आहे. हा व्यापार वाढवणे आणि व्यापारातून दोन्ही देशांचे जास्तीत जास्त हित साधणे यासाठी नव्याने काही मुद्यांवर चर्चा होणार आहे. दोन्ही देशांचा प्रयत्न २०३० पर्यंत व्यापार ५०० अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याचा आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प आणि मोदी यांच्यात वैयक्तिक मैत्री निर्माण झाली. यातून पुढे दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यास मदत झाली होती. यामुळे पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या आणि ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी सुधारण्याची शक्यता आहे.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…