राहुल गांधींच्या मनावर परिणाम झालाय! भारताची बदनामी कुणाच्या अजेंड्यावर?

Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

मुंबई : “राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने परदेशात जाऊन भारताची, लोकशाही संस्था आणि संविधानाची बदनामी करत आहेत. निवडणुकीत सातत्याने पराभूत झाल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालाय,” अशी थेट टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्षाचा नेता म्हणून जर कोणी परदेशात जाऊन देशाचं नाव खराब करत असेल, तर तो कोणाचा अजेंडा राबवतोय, हा संशय निर्माण होतो. त्यांना पराभव पचलेला नाही, म्हणून राहुल गांधी निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीवरच प्रश्न उपस्थित करत आहेत. हा केवळ बालिशपणा आहे.”

ते पुढे म्हणाले, “राहुल गांधींनी देशात राहून काम करावं, जनतेत विश्वासार्हता निर्माण करावी. परदेशात फिरून भारताची निंदा करून मते मिळणार नाहीत. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली,  कुठेही त्यांना यश मिळालेलं नाही. आता तरी त्यांनी भारताची बदनामी करणं थांबवावं.”

दरम्यान, भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही राहुल गांधींवर टीका करताना म्हटलं, “राहुल गांधी हे लोकशाहीविरोधी आहेत. जे भारतीय मतदारांचा विश्वास जिंकू शकले नाहीत, तेच लोक परदेशातून भारताच्या लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न उभे करत आहेत. जॉर्ज सोरोसच्या अजेंड्यावर राहुल गांधी काम करतायत का?”

Recent Posts

भारताने पाकिस्तानच्या फेक नरेटिव्हचा बुरखा फाडला

नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…

6 minutes ago

पाकिस्तानचा खासदार घाबरला; संसदेत ढसाढसा रडला!

एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…

28 minutes ago

भारताच्या हल्ल्यात मारला गेला जैश – ए – मोहम्मदचा कमांडर रउफ असगर, भारतीय विमान अपहरणाचा होता सूत्रधार

इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…

2 hours ago

रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त; भारताच्या ड्रोन हल्ल्याने पाकिस्तान हादरला!

पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…

2 hours ago

Mumbai Rain Update: मुंबईकरांना अवकाळी पाऊसाने झोडपले, ‘या’ भागात यलो अलर्ट

मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…

3 hours ago

१६ वर्षांपूर्वीचा बॉम्बस्फोट, पण अजूनही निकाल नाही!

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…

3 hours ago