जम्मू काश्मीरला पावसाचा जबर तडाखा, शाळा बंद, वाहतूक कोलमडल्यामुळे जनजीवन विस्कळीत

Share

श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात अनेक ठिकाणी हिमवृष्टी सुरू आहे. राज्यात काही ठिकाणी गारा पडल्या तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वारे, गारपीट, मुसळधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, निवडक ठिकाणी झालेली हिमवृष्टी यामुळे सामान्यांचे हाल होते आहेत. फळबागांचे नुकसान झाले आहे. काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात हिमवृष्टी सुरू आहे. सततच्या हिमवृष्टीमुळे गुरेझ-बांदीपोरा हा वाहतुकीच्यासाठी महत्त्वाचा असलेला रस्ता बंद केला आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक रस्त्यांवर पावसाचा तडाखा बसल्यामुळे चिखल झाला आहे. वाहने चालवणे अशक्य झाले आहे. चालत प्रवास करणेही कठीण झाले आहे. सरकारने लोकांना जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून नाशरी आणि नवयुग बोगद्यादरम्यानचा प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. रामबनमध्ये जमीन खचल्यामुळे महामार्गाचे नुकसान झाले आहे. महामार्ग पुन्हा कार्यरत करण्यासाठी किमान ४८ तास लागतील, असा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाने राज्यात अनेक ठिकाणी शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हवामान विभागाने सोमवारी २१ एप्रिल रोजी पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये गेल्या २४ तासांत १६.४ मिमी, बडगाममध्ये १८.० मिमी आणि कुपवाडामध्ये २०.० मिमी पावसाची नोंद झाली. कोकरनाग आणि पहलगाममध्ये अनुक्रमे ३३.२ मिमी आणि २७.८ मिमी पावसाची नोंद झाली. उत्तर काश्मीरच्या उंच भागात वसलेल्या गुलमर्गमध्ये खोऱ्यातील सर्वाधिक ३५.२ मिमी पाऊस पडला आणि येथे शून्याखालील तापमान -०.८ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदले गेले.

लडाखमध्ये हिमवृष्टी सुरू आहे. कारगिलमध्ये सर्वाधिक २६.५ सेमी हिमवृष्टी झाली. द्रास आणि पदुम दोन्ही ठिकाणी पाऊस आणि हिमवृष्टीची नोंद झाली. द्रासमध्ये ५ मिमी पाऊस आणि ५ सेमी हिमवृष्टी झाली. दुममध्ये ५ मिमी पाऊस आणि २ इंच (सुमारे ५ सेमी) हिमवृष्टी झाली. खलस्तेमध्ये ७.० सेमी आणि लेहमध्ये ०.५ सेमी हिमवृष्टी झाली.

वाहतूक पोलिसांनी परवाने देण्यासाठीच्या चाचण्या १९ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवल्याचे जाहीर केले आहे. चालकांना दिलेल्या टायमिंग स्लॉटच्या पावत्या जपून ठेवण्याचे आवाहन केले आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी वाहने कमी वेगाने पण दोन्ही बाजूंनी जात – येत आहेत. अवजड वाहनांची वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद आहे. चालकांना फक्त दिवसा गाड्या चालवा असेही निर्देश देण्यात आले आहेत. रामबन आणि बनिहाल येथे जमीन खचल्यामुळे महामर्गाचे तसेच आसपासच्या भागांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी तातडीने डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. चालकांना रस्त्यात अनावश्यक थांबे घेणे टाळा, असे निर्देश देण्यात आले आहेत. मुघल रोड, सिंथन रोड आणि एसएसजी रोड बर्फ साचल्यामुळे बंद आहेत.

नागरिकांना महत्त्वाचे काम नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. अनेक ठिकाणी सोमवार २१ एप्रिल रोजी पुन्हा पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आठवड्याभरासाठी शेतीची कामं टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नद्यांच्या पाण्याच्या पातळीत एकदम वाढ झाली आहे. यामुळे राज्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे.

Recent Posts

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

7 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

22 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

1 hour ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

6 hours ago