मुंबई : व्यवसायात पारख असते, पण विश्वासाचं काय? तो तुटला… तेही तब्बल २ कोटी रुपयांवर! एका हिरा व्यापाऱ्याने एका कंपनीकडून दागिन्यांचे व्यवहार करताना घेतलेला निर्णय त्याच्यावर जणू आर्थिक आघात ठरला आहे.
मुंबई पोलिसांनी तीन व्यक्तींविरोधात आणि त्यांच्या कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी कथितपणे ४८ वर्षीय हीरा व्यापाऱ्याला ५ कॅरेट म्हणजे तब्बल ६० सोलिटेअर्स पुरवण्याचं आमिष दाखवून २ कोटी रुपये उकळले.
हीरा व्यापाऱ्याची ओळख प्रवीण पटेल नावाच्या परिचिताच्या माध्यमातून चिराग कोठारी, निमीश कोठारी आणि परवेज मन्सुरी या तिघांशी झाली. व्यवहार ठरला. व्यापाऱ्याने विश्वास ठेवून त्यांच्या कंपनीच्या खात्यात संपूर्ण पैसे ट्रान्सफर केले.
ना हिर्यांचा पत्ता, ना पैशांचा मागमूस. वेळ गेली, अपेक्षा तुटली… आणि अखेर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली.
१७ एप्रिल रोजी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी या तिघांविरुद्ध फसवणूक व विश्वासघाताचे गुन्हे नोंदवले आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांनी संबंधित कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू केला आहे.
व्यवसायात विश्वास हवा, पण प्रत्येक व्यवहारात सावधगिरी हवीच. एक चूक आणि करोडोंचं नुकसान! आता पाहावं लागेल, या व्यापाऱ्याला न्याय मिळतो, की हिर्यांसारखीच ही आशा पण हरवते?
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…