मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला. या हल्ल्यामागे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हात होता, असा आरोप महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केला. स्थानिकांच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला होऊच शकत नाही. ज्यांचा हल्ल्यामागे अदृश्य हात होता त्या लोकांना हल्ला होणार असल्याची कल्पना होती, असे माधव भांडारी म्हणाले. दाभोलकर, पानसरे, लंकेश आणि कलबुर्गी या हत्या साखळीद्वारे हिंदुत्ववादी संघटना मोडीत काढण्याचे षडयंत्र आहे, असाही आरोप त्यांनी केला.
गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. देशात राजकीय बदल झाला तरी केवळ तेवढ्याने भागत नाही. सरकार आपले असले तरी व्यवस्था आपली नाही. पोलिस, महसूल, न्यायव्यववस्था अशा सर्व क्षेत्रांत वेगळे लोक आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले म्हणजे आपण यशस्वी झालो, असे नाही. व्यवस्था बदलण्याचे मोठे आव्हान आहे; असे माधव भांडारी म्हणाले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेले विक्रम भावे यांच्या ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी मुंबईत माधव भांडारी यांनी केले. याप्रसंगी सनातन संस्थेचे अभय वर्तक, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे भावे उपस्थित होते.
सत्ता बदलली तरी पोलिस व्यवस्था बदललेली नाही. दाभोलकर हत्या प्रकरणात शिक्षा झालेले शरद कळसकर आणि सचिन अंदुरे निर्दोष आहेत. त्यांची सुटका होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. आमच्या कामाचा बारामतीच्या काकांना राग होता. यामुळेच अप्रत्यक्षपणे दाभोलकर हत्या प्रकरणात अडकवून हिंदुत्ववादी संघटनेचे कंबरडे मोडण्याचे काम केले गेले अशी टीका ॲड. संजीव पुनाळेकर यांनी केली. तर महाराष्ट्र अंनिसवर प्रशासक नेमा आणि संघटनेच्या कामाची तपासणी करा. या संघटनेला नक्षलवादी संघटना म्हणून जाहीर करा, अशी मागणी सनातन संस्थेचे अभय वर्तक यांनी केली.
नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…