मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर असल्यामुळे चेन्नईला फायदा झाला. आजचा सामना वानखेडे स्टेडियमवर होत आहे जे फलंदाजीला उपयुक्त आहे.
चेन्नई व मुंबई हे दोन्ही संघ ह्या हंगामात मोठी धावसंख्या उभारू शकली नाही. दोन्ही संघ अगोदरचा सामना जिंकल्यामुळे दोन्ही संघाचे मनोबल उंचावले आहे व आता सर्वच संघात जिंकण्याची चढाओढ सुरु झाली आहे. मुंबईचा सलामीचा प्रश्न अजून सुटलेला नाही, अजूनही हिटमॅन रोहित शर्मा संघाला एक आश्वासक सुरवात करून देण्यात अपयशी ठरला आहे.
मधल्या फळीत विल जैक्सच्या रूपाने अजून एक फलंदाज मुंबईच्या संघात सामील झाला आहे त्यामुळे मुंबईसाठी ती एक जमेची बाजू आहे. गोलंदाजीमध्ये बुमराहचे आगमन मुंबईसाठी खूप महत्त्वाचे आहे कारण शेवटच्या षटकात बोल्ट व पंड्या तेवढा प्रभावी ठरत नाही. चेन्नईच्या बाबतीत फलंदाजीमध्ये अजूनही हा संघ चाचपडताना दिसतो आहे. धोनीचे नेतृत्व फलंदाजीमध्ये कमी पडते आहे, तसेच शेवटच्या षटकात हाणामारी करण्यासाठी त्यांच्याकडे हीटरची कमतरता आहे. चला तर बघूया हार्दिक पंड्याचा संघ मागील पराभवाचा वचपा काढणार का?