RCB vs PBKS, IPL 2025: विराट विरुद्ध श्रेयस कोण बाजी मारणार?

Share

मुंबई(ज्ञानेश सावंत): आयपीएल २०२५ आता बहरत चालली आहे, दिवसेंदिवस ह्या स्पर्धेत चुरस निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. अगदी कालचा सामना घेतला तर शेवटच्या षटकात ९ धावा हे काय २०-२० साठी अशक्य नाही परंतु तो सामना सूपर ओव्हर पर्यंत जाऊन पोचला. आज बेंगलोरच्या चेन्नास्वामी मैदानावर पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स एकमेका समोर उभे ठाकणार आहेत.

दोन्ही संघ आयपीएल मध्ये आता पर्यंत सहा पैकी चार सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्सने अगोदरच्या सामन्यात राजस्थानचा ९ गडी नी पराभव केला तर पंजाबने १११ धावा करून १६ धावांनी कोलकत्ता नाईट रायडर्सवर विजय मिळविला. चेना स्वामी स्टेडियम हे फलंदाजीसाठी उपयुक्त आहे आणि दोन्ही संघामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असलेले फलंदाज आहेत त्यामुळे आज एक मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते.

आज आपल्याला विराट आणि श्रेयस यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळेल. दोघेही सध्या आपापल्या संघासाठी फार सुंदर खेळताहेत. चेन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी ही हिटरसाठी प्रसिद्ध आहे. येथे बाउंड्री लाइन जवळ असल्यामुळे जास्त धावा होण्यास मदत होते. ह्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजाणा सुरवातीला चांगला बाउंस मिळतो त्यामुळे झटपट विकेट घेण्याची संधी असते.

चला तर बघूया चेन्नास्वामी मैदानावर पंजाबचे शेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला पराभवाचे पाणी पाजतात का?

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

3 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

37 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago