मुंबई : ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील बाजूचे अर्थात पुणे, नवी मुंबईहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचे काम अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. या मार्गिकेचे १ मे रोजी लोकार्पण होण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास ठाणे खाडी पूल १ आणि २ वरील भार कमी होणार असून पुणे, नवी मुंबई – मुंबई प्रवास सुसाट होण्यास मदत होणार आहे.
मुंबई आणि नवी मुंबईला रस्ते मार्गे खाडी ओलांडून जाण्यासाठी सध्या दोन ठाणे खाडी पूल कार्यान्वित आहेत. पहिला ठाणे खाडी पूल १ आणि दुसरा ठाणे खाडी पूल-२. १९७३ मध्ये ठाणे खाडी पूल – १ बांधण्यात आला असून या दोन पदरी खाडी पुलावरून केवळ हलक्या वाहनांची वाहतूक होते. याच ठाणे खाडी पुलापासून २२ मीटर अंतरावर १९९४ मध्ये ठाणे खाडी पूल-२ बांधण्यात आला. या पुलावरून अवजड वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे ठाणे खाडी पूल-२ वरील भार दिवसेंदिवस वाढत आहे.
वाहनांची संख्या वाढत असल्याने आता या पुलाचा सेवा दर्जाही खालावला आहे. त्यामुळे या पुलांवरील भार कमी करण्यासाठी, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएसीने एकूण १.८३७ किमी लांबीचा तीन-तीन पदरी आणि ठाणे खाडी पूल २ ला समांतर असा ठाणे खाडी पूल ३ बांधण्याचा निर्णय घेतला. ७७५.५७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या कामास २०२० मध्ये सुरुवात झाली. हा प्रकल्प याआधीच पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना संकट आणि इतर तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पास विलंब झाला. पण कोरोना संकट टळल्यानंतर एमएसआरडीसीने कामाला वेग दिला आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील उत्तरेकडील बाजू अर्थात मुंबईहून नवी मुंबई, पुण्याच्या दिशेने जाणारी मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यात आली. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यास मदत झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…