Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! महापालिकेचे नागरिकांना आवाहन

Share

ठाणे : सध्या तीव्र उन्हाळा (Summer Season) असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत तीव्र पाणीटंचाई (Water Shortage) निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुणे, व नळ सुरू ठेवून काम करणे टाळावे व पाण्याची बचत करावी असे आवाहन ठाणे (Thane News) महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

शक्यतो गाड्या धुऊ नयेत त्याऐवजी बोअरवेलच्या पाण्याने ओल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात. अंगणात शक्यतो पाणी मारू नये, नळ सुरू ठेवून कपडे धुणे, भांडी घासणे, दाढी करणे टाळावे. घरातील नळांची गळती दुरुस्त करावी. तसेच सोसायटीतील गळकी टाकी, पाईप, व्हॉल्व्ह दुरुस्त करावेत. इमारतीच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होणार याची दक्षता घ्यावी, अन्यथा याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास अथवा तसे आढळून आल्यास संबंधीत इमारतीचे / सोसायटीचे नळ कनेक्शन खंडीत करण्यात येईल. शक्यतो रोज आंघोळीसाठी शॉवर व बाथटबचा वापर करू नये. स्वच्छतागृहामध्ये डुअल फ्लशचा वापर करावा. इमारतीतील जिने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरु नये.

पाण्याचा अनावश्यक साठा करु नये व साठा केलेले पाणी रोज सकाळी ओतून देण्याची सवय बंद करावी. इमारती/ सोसायटी/ संकुलांमधील तरण तलावास पिण्याचे पाणी वापरू नये व वारंवार पाणी बदलण्यात येऊ नये. शक्यतो आठवड्यातील पाच दिवस धुण्यायोग्य सगळे कपडे एकत्र करून एकाच दिवशी धुवावेत. इतर दिवशी गरज पडल्यास दररोज लागणारे छोटे कपडे हाताने कमी पाण्यात धुवावेत. कपडे धुण्याचे मशीन आठवड्यातून एकदा किंवा अगदी आवश्यक असेल तेव्हा दोनदाच आणि ते पूर्ण क्षमतेने वापरावे असे केल्यास पाण्याची बचत व मशीनचा पूर्ण क्षमतेने वापर होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे कपडे धुण्याचे मशीन किंवा हाताने कपडे धुऊन निर्माण होणारे निरुपयोगी पाणी साठवण करून पुढचे दोन दिवस फ्लश, बाथरूम धुणे, फरशी पुसणे, गाड्या धुणे व बगीचा आदीसाठी वापरावे. ‘पाणी अनमोल आहे, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा, पाणी वाचवा, पाण्याचा अपव्यय/ नासाडी टाळा’ असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Recent Posts

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

11 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

31 minutes ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

45 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

1 hour ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

2 hours ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago