पुण्यात ‘खोट्या बाकरवडी’चा पर्दाफाश; चितळे बंधूंचं नाव वापरून पुण्यात गंडा!

Share

पुण्यात राहून ‘चितळे बंधू मिठाईवाले’ हे नाव ऐकलेलं नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. पण… याच नावाच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झालाय. आणि त्यात बळी पडलेत ‘बाकरवडी’चे चाहते… ‘बाकरवडी’ची ही लोकप्रियता कुणाच्या तरी फसवणुकीचं साधन बनली.. आज आपण ऐकणार आहोत ‘खोट्या बाकरवडी’च्या फसवणुकीची खरी कहाणी!

चितळे स्वीट होम या दुकानानं लोकांची दिशाभूल करत चितळे बंधूंच्या नावाखाली आपली बाकरवडी विकली. चितळे बंधूंचे स्वीय सहायक नितीन दळवी यांनी ग्राहकांकडून ऐकले की बाकरवडीची चव बदललीय!.. ते चक्रावले… त्यांनी बाजारातून काही पाकिटं घेतली आणि पाहणी केली. आणि इथेच उलगडा झाला एका मोठ्या फसवणुकीचा!

सदाशिव पेठेतील ‘चितळे स्वीट होम’ नावाच्या दुकानाने एक नवाच ब्रँड बाजारात आणला होता… ‘पुणेरी स्पेशल बाकरवडी’… पण पॅकिंगवर मात्र वापरले गेले ‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांचे अधिकृत ई-मेल, ग्राहक क्रमांक, संपर्क तपशील! हे पाहून नितीन यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

विश्रामबाग पोलिसांनी ‘चितळे स्वीट होम’चे मालक प्रमोद प्रभाकर चितळे यांच्यावर IPC कलम ३१८(२), ३५० आणि IT कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत भागीदार इंद्रनील चितळे यांनीदेखील ब्रँडचा सरळ सरळ गैरवापर केल्याबद्दल स्वतंत्र तक्रार दाखल केलीय.

प्रसिद्ध नाव, नावाजलेली चव, आणि ग्राहकांचा विश्वास… हे सगळं एका चुकीच्या वापराने उध्वस्त होऊ शकतं. ब्रँड म्हणजे केवळ नाव नाही, तो असतो गुणवत्तेवर उभा असलेला विश्वास… तोच जर खोट्या नावाने विकला गेला, तर फसवणूक ही केवळ कंपन्यांची नव्हे तर आपल्या भावनांचीही होते.

म्हणूनच, एखादं उत्पादन विकत घेताना त्याच्या मूळ स्त्रोताची खातरजमा करा. ब्रँडवर प्रेम करा, पण डोळस व्हा. आपला विश्वास कोणी विकत घेऊ नये, यासाठी सजग राहा…

Recent Posts

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

20 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

23 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

43 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

1 hour ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

1 hour ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

2 hours ago