पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे पर्यावरणाला धोका

Share

ढिगाऱ्यांचा चुकीचा साठा सावित्री व चोळई नदीपात्राला धोकादायक!

पोलादपूर : महाबळेश्वर-वाई-सुरूर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम गेल्या महिन्यापासून युद्धपातळीवर सुरू झाले असले तरी या कामामुळे पोलादपूर परिसरातील सावित्री व चोळई नद्यांना पर्यावरणीय धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. डोंगर उतार व साईडपट्ट्यांची माती उकरून थेट सावित्री नदीच्या काठावर टाकली जात असून, आगामी पावसाळ्यात या मातीचा चिखल नदीपात्रात पसरून प्रदूषण वाढू शकते.


डोंगर खणून नदीकाठी भराव – पर्यावरणाचा विसर?

रस्त्याच्या रुंदीकरणासाठी साईडपट्ट्या व डोंगर उतारावरील माती सावित्री नदीच्या पोलादपूर नगरपंचायतीच्या जॅकवेलजवळील गॅबियन स्ट्रक्चरलगत टाकली जात आहे. त्याचबरोबर चोळई नदीच्या काठावरही ढिगारे उभे करण्यात आले आहेत. हे काम रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील सुमारे २४.२०० किमी रस्त्यावर सुरू असून, रानबाजिरे, कापडे बुद्रुक, आड, कुंभळवणे यासारख्या गावांचा समावेश आहे.


हरित लवादाचा दंडही उपयोगी पडला नाही

सावित्री नदीतील प्रदूषणाच्या कारणावरून २०२१ मध्ये हरित लवादाने नगरपंचायतीवर ७ लाखांचा दंड ठोठावला होता. तरीही सावध न होता नगरपंचायतीने शहरातील घन व द्रव कचरा नदीपात्रात डंप करण्यास सुरुवात केली होती. त्यात आता रुंदीकरणाच्या मातीचा भराव देखील पर्यावरणीय संकटात भर टाकतो आहे.


नागरिकांमध्ये चिंता – प्रशासनाकडे अपेक्षा

पोलादपूर शहरालगतच्या या कामामुळे नदी प्रदूषणाचे संकट वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी पोलादपूर तहसिलदारांनी हस्तक्षेप करून मातीच्या ढिगाऱ्यांचा योग्य साठवणूक करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा सावित्री नदीची स्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे.


घाटरस्ता पुन्हा एकदा चर्चेत

२१ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे रस्त्याच्या कायमस्वरूपी मजबूतीकरणासाठी महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या सातारा बाजूने कामाला सुरुवात झाली असून रायगड जिल्ह्यातील भागातही काम प्रगतीपथावर सुरू आहे.


पण हे सगळे वास्तव चित्र पाहता, एकीकडे विकासकामे सुरू असतानाच दुसरीकडे नद्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. पावसाळ्यापूर्वीच योग्य नियोजन न झाल्यास पर्यावरणीय संकट उंबरठ्यावर उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Recent Posts

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

53 minutes ago

IND vs PAK Tension: प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर देऊ, जयशंकर यांनी EUला दिली पाकिस्तान हल्ल्याची माहिती

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…

2 hours ago

भारताने लाहोर-सियालकोटमध्ये केला हल्ला, पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…

2 hours ago

PBKS vs DC, IPL 2025: मोठी बातमी! पाकिस्तान हल्ल्यादरम्यान रद्द झाला पंजाब-दिल्लीचा IPL सामना

धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…

3 hours ago

Jammu Drone Attack : पाकड्यांची मस्ती काय थांबेना! जम्मूत ड्रोन हल्ला, पठाणकोठमध्ये स्फोट, जम्मूमध्ये ब्लॅकआऊट

जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…

4 hours ago