मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून नागरिकांना उन्हाच्या कडाक्याचा सामना करावा लागत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून वाढत्या उन्हाच्या झळांमुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र नागरिकांना आता उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रासह इतर २० राज्यांना वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह देशातील २० राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या काही भागांत गारपीटीची शक्यता आहे.
तसेच बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही जिल्ह्यांत हलका पाऊस आणि जोरदार वारे वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आसाम, मणिपूर, मेघालयातील काही जिल्ह्यांत पाच दिवस पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे.
सध्या मध्य प्रदेशापासून विदर्भासह मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडू ते मन्नाताच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. तसेच मध्यप्रदेशसह समुद्रसपाटीपासून नजीकच्या भागांमध्ये साधारण ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहताना दिसत आहेत. यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती झाली असून राज्याच्ाय बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा दिला आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…