Nitin Gadkari : आता टोलनाके राहणार नाहीत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

Share

१५ दिवसात येणार नवी पॉलिसी

मुंबई : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईतील दादर येथे डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करुन अमर हिंद मंडळाच्या ७८व्या व्याख्यानमालेत उपस्थितीत दर्शवत मार्गदर्शन केले. बाबासाहेबांचे जीवन सामाजिक आर्थिक समतेसाठी महत्त्वाचे आहे. कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी लोकप्रबोधन महत्त्वाचे आहे, विचारमंथन आवश्यक आहे. पण, आपल्या देशात विचार भिन्नतेपेक्षा विचारशून्यता असल्याची खंत गडकरी यांनी व्यक्त केली. येथील वाख्यानमालेत बोलताना त्यांनी देशभरातील रस्ते, पूल, टोलनाके आणि भावी प्रकल्पांबाबत माहिती दिली. तर, टोलबाबत मी जास्त सांगणार नाही, पण तुम्हाला लवकरच १५ दिवसांच्या आत अशी पॉलिसी येईल, की टोलबाबत तुमची कोणतीही तक्रार राहणार नाही, अशी केंद्रीय मंत्री गडकरींनी घोषणाच केली.

टोलबाबत मी जास्त सांगणार नाही, पण तुम्हाला लवकरच १५ दिवसांच्या आत अशी पॉलिसी येईल, की टोलबाबत तुमची कोणतीही तक्रार राहणार नाही. पण मी महाराष्ट्राच्या टोलबाबत बोलत नाही, NHI राष्ट्रीय महामार्गाबाबत बोलतोय, असे नितीन गडकरी यांनी म्हंटल. आता टोलनाके राहणार नाहीत, पण सॅटेलाईट सिस्टीमद्वेरा तुम्ही तिथून निघाल्यानंतर तुमच्या नंबरप्लेटवरुन तुमच्या बँक अकाऊंटमधील पैसे कपात होतील, अशी माहिती देखील नितीन गडकरी यांनी दिली. तसेच, पुढच्या २ वर्षात इंडियन रोड इनफ्रा अमेरिकेपेक्षा चांगले राहील असेही ते म्हणाले. तसेच, मुंबई-गोवा महामार्ग जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

टोलनाक्यांवरील रांगा कमी करण्याकरता सरकार पातळीवर अनेक उपाययोजना आणल्या जात आहेत. त्याकरता फास्ट टॅग पद्धत अनिवार्य करण्यात आली आहे. फास्टटॅगकरताही टोलनाक्यावर गाड्यांना बराच काळ रांगेत उभे रहावे लागते. यासाठी देशातील टोलनाकेच आता बंद व्हावेत, याकरता केंद्र सरकारने नवी यंत्रणा राबवण्याचा विचार केला आहे. असे केंद्रीयमंत्री गडकरी यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, “सॅटलाईट बेस फ्री टोलिंग सिस्टिम तयार करतोय. यामुळे टोलनाके राहणार नाहीत. तुम्हाला कोणी अडवणार नाही. कॅमेऱ्याद्वारे तुमच्या नंबरप्लेटवरून टोल निघेल. तुम्ही जिथून निघालात तिथपासून तुम्ही जिथून बाहेर पडाल तिथपर्यंतचाच टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाणार आहे.” तसेच या नवीन धोरणात, सरकार लोकांना तीन हजार रुपयांमध्ये फास्टॅग रिचार्ज करण्याची सुविधा देणार आहे. त्यानंतर त्यांना पुढील एक वर्षासाठी कोणत्याही टोल प्लाझावर कर भरावा लागणार नाही असे त्यांनी सांगितले.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

43 seconds ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

28 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

1 hour ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago