Share

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातानंतर मात्र गावकऱ्यांची चांदीच चांदी झाली. आज (दि १५) सकाळी आठच्या सुमारास अहिल्यानगरमध्ये पेट्रोलच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर झाला. मात्र जखमी झालेल्या चालकाचे प्राण वाचवायचे सोडून या अपघाताची बातमी गावभर समजल्यावर गावकऱ्यांनी पेट्रोल घेण्यासाठी गर्दी केली.

मिळलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरच्या करंजी घाटात आज (दि १५) सकाळी २० हजार लिटर क्षमतेचा पेट्रोलचा टँकर उलटून अपघात झाला. मुंबईवरून परभणीच्या दिशेने हा टँकर निघाला होता. पण घाटामध्ये हा टँकर उलटला. टँकरचा ब्रेकफेल झाल्याने माणिकशहा पीरबाबा दर्ग्याजवळ टँकरला अपघात झाला. या अपघातामध्ये टँकर चालक गंभीर जखमी झाला. पेट्रोलच्या टँकरच्या अपघाताची बातमी समजताच गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली.

स्वतःच्या घरातून शक्य होतील ती भांडी घेऊन ते पेट्रोल भरण्यासाठी आले. कुणी पाण्याच्या बाटल्या, कुणी पाण्याचे कॅन, तर कुणी दुधाच्या किटल्या घेऊन आले आणि त्यामध्ये पेट्रोल भरून ते पसार देखील झाले. अपघातानंतर टँकरमधून पेट्रोलची मोठ्या प्रमाणात गळती सुरू होती त्यामुळे माणिकशहा पीरबाबा दर्ग्याजवळ रस्त्यावर सगळीकडे पेट्रोल पसरले होते. अपघाताची माहिती मिळताच अहिल्यानगर आणि पाथर्डीतून अग्निशमन दलाच्या दोन गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.

Recent Posts

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

12 minutes ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

16 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

30 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

49 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

1 hour ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

1 hour ago