नवी दिल्ली : शेतकऱ्यांसह संपूर्ण देशवासीयांसाठी दिलासादायक बातमी! भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार यंदा देशात मोसमी पाऊस सरासरीपेक्षा १०५ टक्के अधिक पडण्याची शक्यता आहे. एल निनो स्थिती निष्क्रिय असून, पावसाला अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन, हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा, आणि शास्त्रज्ञ आर. के. जेनामणी यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत हा हवामान अंदाज जाहीर करण्यात आला.
जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात १०५% सरासरीहून जास्त पाऊस पडेल.
एल निनो अथवा ला निना यापैकी कोणतीही स्थिती सध्या सक्रीय नाही; दोन्ही महासागरांतील स्थिती तटस्थ व पावसाला पोषक आहे.
युरोशिया आणि हिमालयातील बर्फाच्छादनही यंदा कमी आहे – जी एक पावसास अनुकूल बाब मानली जाते.
गेल्या ५० वर्षांचा सरासरी पाऊस ८७ सेमी असून, यंदा त्यात ५% वाढ होण्याची शक्यता आहे.
देशाच्या बहुतांश भागात पावसाची स्थिती अनुकूल असेल.
मात्र लडाख, ईशान्य भारत आणि तामिळनाडू या भागात पावसाचे प्रमाण थोडकं राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने यासोबतच एप्रिल ते जून या कालावधीत अनेक भागात तीव्र उष्णतेच्या लाटा आणि काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.
या अंदाजामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरिपाच्या पिकांची पेरणी आणि उत्पादन दोन्ही वाढण्याची शक्यता असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला याचा सकारात्मक फायदा होणार आहे.
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…