रानबाजिरे येथील वणव्यामुळे जळून खाक झालेला गुरांचा गोठा (छाया-शैलेश पालकर)
पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे परिसरात लागलेल्या वणव्यात येथील एका शेतकऱ्याच्या गुरांच्या वाड्याला आग लागून वाडा पूर्णतः जळून खाक झाला. तर वाड्यातील ३ गुरे होरपळून गतप्राण झाली.
कापडे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सूर्यकांत नथुराम सावंत रा. रानबाजिरे यांच्या मालकीचा गोठा मोरगिरी भागातून वणवा आल्याने आग लागून जळून खाक झाला. या आगीची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि महाड नगरपरिषदेचा अग्निशमन बंब आणि काळभैरव रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर व सर्व सदस्यानी घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तीन गुरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
यावेळी तहसील कार्यालयाचे परशुराम पाटील व तलाठी वैराळे यांनी ग्रामस्थांसमवेत दाखल होत परिसराची पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून कापडे भागात वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे जनावरांचे, वनसंपत्तीचे तसेच ग्रामस्थांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…