BMC : टँकर मालकांचा संप मागे, विहिरी आणि कुपनलिका आता महापालिका घेणार नाही ताब्यात

Share

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील टँकरचालकांचा संप पाहता, व्यापक जनहित लक्षात घेता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू करुन मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला. याअनुषंगाने, आपली बाजू मांडण्यासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची १४ एप्रिल २०२५ भेट घेतली. या बैठकीत दोन्ही बाजुंनी सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर काही वेळाने टँकरचालकांनी संप मागे घेत असल्याचे पत्रकार परिषदेतून जाहीर केले. त्यामुळे मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच पाणीपुरवठा करणारे खासगी टँकर्स अधिग्रहित करण्याची महानगरपालिका प्रशासनाला आवश्यकता भासणार नाही.

या बैठकीला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्यासह कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ तर मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीने सचिव राजेश ठाकूर, उपाध्यक्ष हरबंस सिंग, जीतू शाह, खजिनदार अमोल मांढरे यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य हजर होते. टँकर चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली. संघटनेच्या मागण्या केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्यात याव्यात. केंद्रीय भूजल प्राधिकरण यांचेकडे वेळोवेळी बाजू मांडण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सहाय्य मिळावे, अशी संघटनेने विनंती केली. तसेच मागण्यांचे सविस्तर निवेदन महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सादर केले.

टँकर चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले की, केंद्रीय भू-जल प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने बजावलेल्या नोटिसांना १५ जून २०२५ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. तसेच, नियम न पाळल्यास विहीर व कूपनलिका धारकांची मान्यता रद्द करण्याच्या नोटिसा परत घेण्याचे ठरले. मात्र ज्या धारकांनी मान्यताच घेतलेली नाही त्याना मान्यता घ्यावी लागेल हे स्पष्ट करण्यात आले. तसेच केंद्र शासनाशी निगडित मागण्या व बाबी संबंधितांपर्यंत पोहोचविण्यासाठी देखील महानगरपालिकेच्या वतीने संघटनेला प्रशासकीय सहाय्य पुरवले जाईल. मात्र तांत्रिक बाबी या शासनाच्या स्तरावरील असून त्यामध्ये महानगरपालिका प्रशासन हस्तक्षेप करू शकत नाही. मुख्यमंत्री यांनी आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री महोदय यांनी दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे टँकर चालक संघटनेने देखील सारासार विचार करून आपली भूमिका ठरवावी, असे गगराणी यांनी बैठकीत स्पष्ट केले.

या सविस्तर व सकारात्मक चर्चेनंतर, मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काही तासांचा अवधी मागून घेतला आणि संघटनेची बैठक घेवून त्याआधारे भूमिका जाहीर करण्यात येईल, ही भूमिका सकारात्मक असेल, असे सांगितले होते. त्यानंतर, असोसिएशनने संप मागे घेत असल्याची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

4 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

4 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

4 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

5 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

5 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

6 hours ago