Crime : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्याने विशालने कारागृहात केली आत्महत्या

Share

कल्याण : कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका भागात २३ डिसेंबर २०२४ रोजी खाऊ आणायला गेलेल्या १३ वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी विशाल गवळी याने तळोजा कारागृहात आत्महत्या केली. तळोजा कारागृहाच्या शौचालयात जाऊन त्याने पहाटे चार ते पाच दरम्यान कधीतरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. विशालच्या आत्महत्येप्रकरणी निवृत्त न्यायाधीश चौकशी करणार असल्याचे समजते.

विशालवर आधीपासूनच दोन विनयभंग, मुलावर लैंगिक अत्याचार, दोन वेळा मारामारी आणि एक जबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल होते. हे सहा गुन्हे केलेल्या आणि तडीपारीचा अनुभव घेतलेल्या विशालने कल्याणमध्ये तेरा वर्षांच्या मुलीचे अपहरण केले, नंतर तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या केली. यानंतर विशालने पत्नीच्या मदतीने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. हे कृत्य केल्यानंतर विशाल शेगावला जाऊन लपला होता. पण नोकरीच्या ठिकाणी रजा मिळवे कठीण होते आणि पैसे आवश्यक होते म्हणून विशालची पत्नी कल्याणच्या घरीच थांबली होती. बेपत्ता मुलीची चौकशी करत पोलीस आले त्यावेळी त्यांना विशालच्या घराच्या जवळ रक्ताचे डाग दिसले. या प्रकरणी कसून चौकशी केल्यावर अखेर विशालच्या पत्नीने सर्व माहिती दिली. यानंतर पोलिसांनी विशालला शेगावमध्ये जाऊन अटक केली होती. विशालला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यामुळे त्याची रवानगी तळोजा कारागृहात झाली होती. तिथेच त्याने आत्महत्या केली.

विशालची आतापर्यंत तीन लग्न झाली होती. पहिल्या दोन्ही लग्नांनंतर काही काळाने त्याच्या पत्नी निघून गेल्या होत्या. तिसरी पत्नी – साक्षी ही खासगी बँकेत नोकरी करत होती आणि त्याच्या सोबतच होती. विशालने जेव्हा तेरा वर्षांच्या मुलीचे अपहरण केले, नंतर तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या केली त्यावेळी साक्षी घाबरली होती. पण विशाल सोडून देईल या भीतीपोटी तिने मृतदेह नष्ट करण्यासाठी विशालला मदत केली होती.

Recent Posts

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

4 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

19 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

1 hour ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

6 hours ago