मुंबई(ज्ञानेश सावंत): मुंबईचा संघ दिवसेंदिवस रसातळला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या पाच पैकी फक्त एकच सामना मुंबईने जिंकला आहे. मुंबईला ह्या हंगामात ना धावांचा पाठलाग करता येत आहे ना पहिली फलंदाजी घेऊन चांगली धावसंख्या उभारता येत आहे. मुंबईचा संघ धावांचा पाठलाग करताना थोडा कमी पडत आहे. मागील दोन्ही सामने त्यांनी फक्त १२ धावांनी गमावले आहेत. त्यांची सलामीची जोडी संघासाठी भक्कम सुरवात करून देण्यात अपयशी ठरत आहे. रोहितला थोडे संयमाने खेळावे लागेल, आज मुंबई संघाला त्याच्या संयमी खेळाची गरज आहे.
मुंबईला गोलंदाजीवरही लक्ष द्यावे लागणार आहे. आज त्यांच्या समोर ह्या हंगामातील सर्वोत्तम संघ खेळणार आहे त्यामुळे मुंबईला फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करावी लागेल. मुंबईसाठी डोकेदुखी असेल ते मिचेल स्टार्कचा सुरवातीचा स्पेल, तो त्यांना संयमाने खेळून काढावा लागेल, अथवा त्याला आक्रमकपणे उत्तर द्यावे लागेल.
मुंबईकडे आक्रमकपणा आहे पण तो ह्या हंगामात अजूनही दिसून आलेला नाही. कदाचित ह्याला कर्णधार जबाबदार असू शकतो. मुंबईकडे जमेची बाजू म्हणजे बुमराहचे आगमन, बुमराह आज संघासाठी संजीवनी बुटीचे काम करू शकतो. तस झाल तर मुंबईच्या संघात एक चैतन्य निर्माण होईल. दिल्लीसाठी बुमराहचा स्पेल खेळणे कठीणच आहे.
मुंबईचा आज पर्यंतचा इतिहास आहे की जेव्हा अशक्य असते तेव्हाच कठीण परिस्थितीत खेळून ते शक्य करून दाखवतात. आज असच काहीतरी होईल अशी अपेक्षा.
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…