Share

मनस्विनी – पूर्णिमा शिंदे

मानवाला परमेश्वरी लाभलेली देणगी आणि वरदान म्हणजे जीवनदान. जगता जगता जीवन आनंदाने जगण्याची गोष्ट आहे. यश-अपयश, सुख-दुःख, हार-जीत हेच तर जीवन. जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.

सुळासाठी छाती पुढे केल्याशिवाय मुकुटासाठी मस्तक पुढे करता येत नाही. रवींद्रनाथ टागोर म्हणतात की, आपले जीवन हे आपणास मिळालेले अनमोल असे दान आहे. त्याचे दान करीत राहिल्यानेच मोल वाढते तर महात्मा गांधी म्हणतात, “जीवनाचे कमळ फुलविण्यासाठी कष्टाचा चिखल तुडवावा लागतो”. आए है इस दुनिया में आए है तो जीनाही पडेगा, जीवनही एक जहर तो पिनाही पडेगा. एकदा एका शिष्याने गुरूला विचारले जीवनाचे सार्थक होण्यासाठी आपण काय केले पाहिजे. तेव्हा गुरू म्हणाले, नि:स्वार्थ बुद्धीने जनसेवा करावी. इतरांचे अश्रू पुसावेत. तहानलेल्यास पाणी द्यावे, भुकेल्यास अन्न द्यावे आणि रंजल्या गांजले यांची सेवा करावी. त्यांना हवी तितकी मदत करावी आणि शिष्याला ते पटले. ज्ञानी याचा राजा संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून आपले जीवन दीपस्तंभांनी उजळले आणि इतरांचे मार्गदर्शक ते बनले. हेच जीवनाचे सार्थक आणि जनसेवा ही ज्ञानार्थ कृतार्थ व्हावी याकरता पसायदान होऊन जगावे हा कानमंत्र त्यांनी दिला. जगद्गुरू तुकोबाराय यांनी जनकल्याणासाठी झोकून घेतले. सर्वस्वाचा त्याग केला. तन-मन-धन अर्पण केले.

स्वतःच्या जीवनाचे सोने केले. साक्षात वैकुंठातून परमेश्वराचे विमान त्यांना घेण्यासाठी आले होते. हे कृतार्थ जीवन मदर तेरेसा, हेलन केलर, बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ, डॉ. कलाम, रतन टाटा यांनीही रंजल्या गांजल्यांना सेवेद्वारे आपल्या जीवनाची पौर्णिमा कृतार्थ केली. देशसेवेसाठी आनंदाने सीमेवर लढणारे सैनिक जवान धारातीर्थी पडतात. देश सेवार्थ लढता लढता मृत्यूला कवटाळतात ते मरण नसून ते शहीद होणं. ती महती त्यांच्या आयुष्य सार्थक होते.

शेतात राबराब राबणारा बळीराजा, अन्नदाता असंख्य लोकांचे जेव्हा अन्न पिकवितात, हजारोंचा पोशिंदा हे सुद्धा सत्कर्म आहे. वसा आणि वारसा आहे. अनाथांचे नाथ बनून दिव्यांग, अपंग, गतिमंद, अनाथ, निराधारांचे शोषितांचे आधारस्तंभ होणं ही सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. तरच आपण आपल्या जीवनामध्ये जन्माला येऊन आपली जीवन बाग फुलवावी. हीच जीवन सफलता इतरांच्या चेहऱ्यावर येणारे हास्य मधुरता, संवेदनशीलता हे आयुष्याचे सार्थक आहे. आयुष्याचे सोनं करायचं असेल तर दुःखी, कष्टी माणसांना वेळोवेळी मदतीचा हात द्या, त्यांचे मायबाप होता आलं पाहिजे. संतमहंतांनी आपल्याला हीच शिकवण दिली. त्यांची प्रेरणा, भावना, सत्कार्य, सत्कर्म अंगी करावीत. आपल्याला देखील संवेदनक्षम, सहिष्णू आणि सत्कार्यपूर्ण जगता आले पाहिजे.

‘जगा आणि जगू द्या’ या उप्तीप्रमाणे सर्वांसाठी खारीचा वाटा तरी उचलता आला पाहिजे. त्यांचे जीवन उजळता आले पाहिजे. हीच आहे जीवनाची कृतार्थ पौर्णिमा…

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

1 hour ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

1 hour ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

2 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

2 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

2 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

3 hours ago