Badlapur : विद्यार्थ्याने शिवी दिली तर होणार कठोर कारवाई

Share

बदलापूर : बदलापूरमधील सर्व शाळांच्या व्यवस्थापनाने शिवी हद्दपार करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्याने शिवी दिली तर त्याच्या पालकांना दंड भरावा लागणार आहे. शाळेत मित्र मैणीणींशी गप्पा मारताना अनेक विद्यार्थी कळत नकळत शिवीगाळ करतात. आपण वापरलेला शब्द शिवी आहे आणि त्याचा अर्थ काय आहे याची पण अनेकांना माहिती नसते. पण बालवयात कळत नकळत झालेल्या या संस्कारामुळे मोठे झाल्यावर हीच मंडळी सर्रास शिव्या देऊ लागण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे चांगली पिढी घडावी या उद्देशाने बदलापूरमधील सर्व शाळांच्या व्यवस्थापनाने शिवी हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.

निर्णयानुसार आता शाळेच्या आवा रात विद्यार्थ्याने शिवी दिली तर त्याच्या पालकांना दंड भरावा लागणार आहे. या दंडाच्या भीतीने मुलं जपून बोलतील आणि शिव्या देणं टाळतील, असा विचार निर्णय घेण्यामागे आहे. मुलांनी शिव्या न देता एकमेकांचा मान राखून बोलावे. माणसाला माणसासारखे वागवावे. कळत नकळतही कोणाचा अपमान करू नये या हेतूने बदलापूरच्या शाळांनी शिवी हद्दपार करण्याचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. बदलापूरच्या आदर्श शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या कार्यशाळेतून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. टीव्ही आणि मोबाईलच्या विश्वात रमलेल्या मुलांचा पालकांशी अतिशय कमी संवाद होत आहे. मुलांच्या रोजच्या वर्तनाकडे सतत लक्ष ठेवणे पालकांना शक्य होत नाही. त्यामुळ शिवी हद्दपार सारखा विद्यार्थ्यांना चांगली शिकवण देणारा, त्यांच्यावर उत्तम संस्कार करणारा उपक्रम शाळांतून राबवण्यास सुरुवात झाली आहे.

शाळांच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांची भाषा सुधारण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या तोंडून शिव्या ऐकू येणार नाहीत. एक सुजाण पिढी घडवण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला आहे.

Recent Posts

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

23 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

26 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

46 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

1 hour ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

1 hour ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

2 hours ago