किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी आणि शिवरायांच्या समाधीच्या जिर्णोद्धाराला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रायगडावर आयोजित विशेष कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी काही मागण्या केल्या. या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब मान्य केल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांसह आपल्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कायद्याने कठोर कारवाई व्हायलाच हवी, असे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासाचे महाराष्ट्र शासनाने प्रकाशन करावे अशीही मागणी केली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब मान्य केल्या.
खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने मागण्या जाहीरपणे केल्या आहेत. पण याआधीच या मागण्यांबाबत राज्य शासन आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात सविस्तर चर्चा झाली आहे. महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करणार आहे. आपल्या महापुरुषांचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून लोटून दिलं पाहिजे. पण आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. आपल्या देशात अशा गुन्हेगारांवर कायद्यानुसार कारवाई होईल. कायद्यात आणखी कठोर तरतुदी करण्याचं आम्ही ठरवलं आहे; असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास तयार करण्याचे काम लवकरच हाती घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
खासदार उदयनराजेंनी केलेल्या प्रमुख मागण्या
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…