Mumbai : मुंबईतील सोडियम व्हेपरचे ९५ टक्के दिवे बनले एलईडीचे

Share

आतापर्यंत १ लाख ३६ हजार ३७० एलईडी बनवले

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील पथदिव्यांच्या उभारणी करताना सोडियम व्हेपरच्या दिव्यांचे रुपांतर एलईडीचे दिव्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आतापर्यंत संपूर्ण मुंबईत ९५ टक्के बसवण्यात आले आहे. मुंबईत १ लाख ४१ हजार १४१ पथदिव्यांच्या तुलनेत १ लाख ३६ हजार ३७० एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत.

केंद्रीय धोरणात्मक निर्णयानुसार विदयुत ऊर्जा बचतीसाठीची योजना महाराष्ट्रात राबविण्याकरिता मा. केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली होती. या बैठकीस महाराष्ट्र शासनाचे ऊर्जा नवीन व नवीकरणीय मंत्री, मुंबई महानगरपालिका आयुक्त, बेस्टचे महाव्यवस्थापक, आणि एनर्जी ईफिशियन्सी सर्विस लि. कंपनी यांना मुंबईतील दिवाबत्तीच्या खांबावर एल. ई. डी. पथदिवे बसविण्याची परवानगी दिली होती.

मुंबईत बेस्ट, अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई लि. महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी लिमिटेड या कंपन्या महानगरपालिकेसाठी कामे करतात. रस्त्यावर असलेले पारंपारिक (सोडियम व्हेपर) पथदिव्यांचे एल.ई. डी. पथदिव्यांमध्ये रूपांतर केल्यानंतर प्रस्तावित परिरक्षण दर महापालिकेला सादर करावा असा समावेश धोरणामध्ये होता. सद्यस्थितीत हा प्रकल्प सुमारे ९५ टक्के पूर्ण झाला आहे. तसेच ऊर्वरित काम हे विविध पायाभूत सुविधांची कामे प्रगतीपथावर असल्याने करता येत नाही. ही पायाभूत सुविधांची कामे पूर्ण होताच ऊर्वरित काम पूर्ण करण्यात येईल असे महापालिकेच्या वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. बेस्टच्या हद्दीत एकूण ४२ हजार ४२१ पथदिवे असून त्यातील ४० हजार ७८४ पथदिव्यांचे एलईडीमध्ये रुपांतर झाले आहे, तर केवळ १६३७ पथदिव्यांचे एलईडीमध्ये रुपांतर झालेले नाही.

पश्चिम उपनगर ते पूर्व उपनगरांमध्ये अदानी इलेक्टीकच्यावतीने पथदिव्यांची देखभाल केली जात असून एकूण ८७ हजार ३४७ पथदिव्यांच्या तुलनेत ८४ हजार ४७० पथदिव्यांचे रुपांतर एलईडीमध्ये झाले आहे तर महावितरणच्या ताब्यातील एकूण ११ हजार ३७७ पथदिव्यांपैंकी ११ हजार पथदिव्यांचे रुपांतर एलईडीमध्ये करण्यात आलेले आहे असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

रस्त्यावरील दिवाबत्तीचे पारंपारिक पथदिव्यांमधून एल.ई.डी. मध्ये रुपांतर केल्याने सरासरी विद्युत एनर्जी युनिटमध्ये 3७. ३५ टक्के आणि विजेच्या बिलामध्ये ३९.२४ टक्के एवढी बचत होत असल्याचे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Recent Posts

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

5 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

25 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

45 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

47 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

1 hour ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

2 hours ago