RCB vs DC, IPL 2025: दिल्लीचा विजयरथ कायम, आरसीबीला त्यांच्याच घरात हरवले, राहुलची जबरदस्त खेळी

Share

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये दिल्लीचा विजयरथ कायम आहे. आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ६ विकेटनी हरवत या हंगामातील सलग चौथा विजय मिळवला आहे. ते दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मात्र घरच्याच मैदानावर पराभवाचा धक्का बसला.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी १६४ धावांचे आव्हान दिले होते.मात्र केएल राहुलच्या दमदार खेळीच्या जोरावर दिल्लीने हा विजय सहज साकार केला. दिल्लीसाठी खेळताना केएल राहुलने नाबाद ९३ धावा केल्या. त्याला ट्रिस्टन स्टब्सने चांगली साथ दिली. त्याने ३८ धावा केल्या. दिल्लीने आरसीबीविरुद्ध ६ विकेटनी सहज विजय मिळवला. दिल्लीने आरसीबीने दिलेले १६४ धावांचे आव्हान ६ विकेट आणि १३ बॉल राखत पूर्ण केले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरूवात धमाकेदार राहिली. विराट कोहली आणि फिल साल्टने मिळून २३ बॉलवर ६१ धावांची भागीदारी केली. या भागीदारीचा अंत फिल साल्ट बाद झाल्याने झाला. साल्टनंतर आरसीबीने देवदत्त पड्डिकल आणि विराट कोहलीची विकेटही लवकर गमावली. पड्डिकलने १ धावा केली तर कोहलीला स्पिनर विप्रज निगमने मिचेल स्टार्कच्या हाती बाद केले.

विराट कोहली बाद झाल्यानंतर आरसीबीचा स्कोर ३ बाद ७४ धावा इतका होता. इंग्लीश फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र त्याला केवळ ४ धावा करून बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादवने जितेश शर्माला बाद करत अडचणी वाढवल्या. आरसीबीकडून टीम डेविडने २० बॉलवर नाबाद ३७ धावा केल्यात. या दरम्यान त्याने चार षटकार आणि दोन चौकार ठोकले.

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

5 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

48 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

50 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago