महारेराचे निर्देश : गृहनिर्माण जाहिरातीत ‘नोंदणी क्रमांक, संकेतस्थळ, QR कोड’ ठळकपणे छापणे बंधनकारक, उल्लंघन केल्यास ५० हजार दंड

Share

मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातीत ‘महारेरा नोंदणी क्रमांक’, ‘महारेराचे (MahaRERA) अधिकृत संकेतस्थळ’ आणि ‘QR कोड’ हे घटक ठळक, वाचनीय आणि जाहिरातीत वापरल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या फॉन्टमध्ये छापणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. महारेराने या संदर्भात परिपत्रक जाहीर करत तातडीने अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.

या नव्या नियमांनुसार, कोणत्याही माध्यमातून – मग ते छापील जाहिरात असो, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया किंवा लिफलेट्स असोत – जर ही माहिती ठरावीक स्वरूपात न छापली गेली, तर संबंधित विकासकावर ५० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. त्यानंतर देखील जर १० दिवसांच्या आत चूक दुरुस्त केली नाही, तर “निर्देशांचा सततचा भंग” मानून पुढील कारवाई केली जाणार आहे.

महारेराच्या निरीक्षणानुसार, अनेक जाहिरातींमध्ये ही मूलभूत माहिती अशा प्रकारे दिली जाते की ती ग्राहकांच्या नजरेतच पडत नाही. काही वेळा QR कोड स्कॅनसुद्धा होत नाही. त्यामुळे ग्राहकांना प्रकल्पाची खरी माहिती मिळणे कठीण जाते. आता QR कोड जर स्कॅन न होणारा असेल, तर त्यावरही कारवाई होणार आहे.

महारेराचे मत आहे की, घर खरेदीदारांनी पारदर्शक आणि अचूक माहिती सहज पाहता यावी, हा या सर्व नियमांचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सर्व विकासकांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महारेराने केले आहे. या अंमलबजावणीस सहकार्य करणे ग्राहकहितासाठी अत्यावश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags: maharera

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

46 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

1 hour ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

2 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

3 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

3 hours ago