Chardham Yatra : एप्रिल महिनाअखेरीस सुरु होणार चारधामचे दर्शन! ‘बद्रीनाथ-केदारनाथ’मध्ये रील्स आणि व्हिडिओ बनवण्यावर बंदी

Share

मंदिर समितीचा मोठा निर्णय

उत्तराखंड : चारधाम यात्रा (Chardham Yatra) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे. यापूर्वी, बीकेटीसी (श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती)ने केदारनाथ (Kedarnath) आणि बद्रीनाथ (Badrinath) धाममध्ये व्हीडिओ आणि रिल बनवण्यास बंदी घातली आहे. याअंतर्गत, दोन्ही मंदिरांच्या ३० मीटरच्या परिघात कोणतीही व्यक्ती व्हीडिओ-रील बनवू शकणार नाही. जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे समितीने स्पष्ट केले आहे.

केदारनाथ आणि बद्रीनाथ धाममध्ये, मोठ्या संख्येने भाविक मंदिराभोवती व्हीडिओ आणि रिल बनवू लागतात. त्यामुळे लोकांना अडचणी येत होत्या. गेल्या वर्षी केदारनाथ धाम संकुलात रिल बनवण्यास पुजाऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. अनेक वेळा येथे वादाच्या परिस्थिती पाहायला मिळाली, ज्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले. म्हणूनच यावेळी चार धाम यात्रेपूर्वी बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीने विशेष तयारी सुरू केली आहे. जेणेकरून भाविकांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. यासाठी मंदिर समिती एक मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करत आहे. यामध्ये आता रील आणि व्हीडिओ करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. (Chardham Yatra 2025)

धार्मिक स्थळांवर व्हीडिओ रील्स (Ban On Reels) इत्यादी बनवणे कितपत योग्य आहे यावर वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. बऱ्याच वेळा, माहितीच्या अभावामुळे, आपण इच्छा नसतानाही चुका करतो. आजच्या पिढीसाठी, मंदिरे, मशिदी किंवा तीर्थक्षेत्रे ही फक्त इंस्टाग्राम रीलची पार्श्वभूमी बनली आहेत. शांती आणि ध्यान यांची जागा आता ट्रेंडिंग संगीत आणि स्टायलिश अँगलने घेतली आहे. यामुळे उत्तराखंड प्रशासनाने केदारनाथ धाममध्ये रील्स बनवण्यावर पूर्ण बंदी लादली आहे. कारण स्पष्ट आहे, धार्मिक पावित्र्याचे उल्लंघन आणि शिस्तीचा अवमान रोखण्यासाठी हे पाऊल उचलेल आहे.

Recent Posts

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

9 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

11 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

47 minutes ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

58 minutes ago

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

3 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

3 hours ago