Uttar Pradesh News : अजबच! पैशांसाठी ३० महिन्यांत २५ वेळा झाली आई! ५ वेळा नसबंदी करूनही पुन्हा झाली गर्भवती?

Share

लखनऊ : लखनऊ मधील आरोग्य विभागाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेची ३० महिन्यात २५ वेळा प्रसूती झाली. याच कालावधीत तिची ५ वेळा नसबंदीही झाली. तरीही महिला गर्भवती राहिल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात एक महिला ३० महिन्यात २५ वेळा आई झाली. याच कालावधीत तिची ५ वेळा नसबंदी झाली. राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागातील गर्भवतींना प्रसुतीनंतर १४०० रुपये, तर शहरातील गर्भवतींना १ हजार रुपये दिले जातात. महिलांना नसबंदीसाठी २ हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम महिलांच्या खात्यात थेट जमा होते. उत्तर प्रदेशच्या आग्र्यातील फतेहाबाद सार्वजनिक आरोग्य केंद्रात आर्थिक ऑडिट सुरु असताना हा घोटाळा उघडकीस आला. या महिलेला २५ वेळा प्रसुती आणि ५ वेळा नसबंदी करण्यासाठी ४५ हजार रुपये देण्यात आले.

या सगळ्या घोटाळ्यात सार्वजनिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान आग्र्यातील फतेहाबाद सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या अधीक्षकांच्या भूमिकेचीही चौकशी होणार आहे. आग्र्याचे मुख्य आरोग्य अधिकारी अरुण श्रीवास्तव यांनी या प्रकरणी चौकशीसाठी समितीची स्थापना केली आहे. यामध्ये तांत्रिक चूक झाली आहे की जाणूनबुजून याबाबत संपूर्ण चौकशी श्रीवास्तव यांच्याच कडक देखरेखेखाली केली जाणार आहे.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

14 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

41 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

1 hour ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago