मुंबई : पूर्व मुक्त मार्गावरून थेट ग्रँटरोडला (Grand Road) प्रवास करता यावा याकरता महापालिकेच्यावतीने (BMC) पूर्व मुक्त मार्ग(ऑरेंज गेट) पासून ते ग्रँटरोड नाना चौक या भागापर्यंत उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे ३००३ कोटी रुपयांचा खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या पुलाच्या बांधकामासाठी प्रत्यक्षात कंत्राटदाराची निवड करण्यात आल्यानंतर या पुलाचे बांधकाम रद्द करण्याच्या विचारात महापालिका प्रशासन (Municipal Corporation) आहे. या मार्गावर एमएमआरडीएच्या वतीने समांतर भूमिगत मार्ग कोस्टल रोडला जोडला जावू शकतो, तर या पुलाची गरज काय असा युक्तीवाद समारे आल्याने या पुलाच्या बांधकामावर मंत्रालयातून लाल शेरा मारल्याने या पुलाचे बांधकाम रद्द करून गुंडाळण्याची वेळ महापालिकेच्या पुल विभागावर आली असल्याचे बोलले जात आहे.
पूर्व मुक्त मार्ग (इस्टर्न फ्रि वे) ऑरेंज गेट ते ग्रँटरोड मधील ताडदेव व नाना चौक यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामांसाठी २० जानेवारी २०२४ रोजी निविदा मागवून १ मार्च रोजी प्रशासकीय मान्यतेने जे कुमार-आरपीएस या संयुक्त भागीदारातील कंपनीला विविध करांसह ३००३ कोटी रुपयांच्या कंत्राट कामाला मंजुरी दिली. विशेष म्हणजे १ मार्च रोजी प्रशासकीय मान्यता आणि २ मार्च २०२४ रोजी प्रशासकांची मंजुरी देत कार्यादेश देण्यात आला होता.
तत्कालिन अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार या पुलाच्या कामाच्या निविदेला गती दिल्याचे बोलले जात होते. या पुलाच्या बांधकामामुळे पूर्व मुक्त मार्ग (इस्टर्न फ्रि वे) ऑरेंज गेट ते ग्रँटरोड मधील ताडदेव व नाना चौक या अंतरासाठी सध्याच्या स्थितीत ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागतो. तिथे या उड्डाणपुलाच्या प्रस्तावित बांधकामामुळे हे अंतर ६ ते ७ मिनिटांचे होईल असा दावा प्रशासनाने केला होता. पूर्वमुक्त मार्ग ऑरेंज गेटपासून जे राठोड मार्ग, हँकॉक पूल, रामचंद्र भट्ट मार्ग, जे. जे. उड्डाणपूल, एम.एस. अली मार्ग व पठ्ठे बापुराव मार्ग अशाप्रकारे या पुलाचे बांधकाम केले जाणार होते.
परंतु आता या पुलाच्या बांधकामाला मंत्रालयातून लाल दिवा दाखवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या पुलाचे बांधकाम रद्द करण्याच्या विचारात पूल विभाग आहे. सध्या कंत्राटदाराला कार्यादेश देण्यता आला असला तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. विशेष म्हणजे एमएमआरडीएच्या माध्यमातून इस्टर्न फ्रि वे ते कोस्टल रोड जोडणाऱ्या भूमिगत वाहतूक मार्गाचे काम एल अँड टी च्या माध्यमातून सुरु असल्याने या पूलाची गरज काय प्रश्न उपस्थित करत या पूलाच्या बांधकामाच्या फाईलवर लाल शेरा मारुन ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या पूलाचे काम रद्द करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. एकाच वेळी दोन मार्गिका तयार करून जनतेच्या पैशांचा अपव्यय केला जात असल्याने पुलाचे बांधकाम रद्द केले जाणार असल्याची दाट शक्यता आहे.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…